शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 14:49 IST

शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी: राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसतांनाही भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्ण दुपट्टीचा कालावधी तब्बल 130 दिवसांवर पोहचला असून ,राज्यात महानगरपालिका क्षेत्रात तो सर्वोत्तम असून भिवंडी शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती निवळण्यात प्रशासना सोबत शहरातील नागरीक ,पोलीस यंत्रणा ,सेवाभावी संस्था ,खाजगी डॉक्टर्स संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे .

मुंबई ,पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना ठाणे ,कल्याण डोंबिवली , मीरा भाईंदर ,नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या व मृत्यु संख्या झपाट्याने वाढत असताना जुलै महिन्याच्या उत्तरार्थत नव्याने आयुक्त म्हणून रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पंकज आशिया यांनी अवलंबिलेल्या चार सूत्री उपाययोजना कामी आल्या असल्याने शहरातील कोरोनावर सध्यातरी नियंत्रण मिळविण्यात मनपा प्रशासनांसह आरोग्य विभागाला यश आले असल्याची माहिती मनपा आयुक्त आशिया यांनी दिली आहे.

कोरोनची परिस्थिती शहरात बिकट झाल्याने सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वप्रथम पाऊले उचलल्या नंतर आयजीएम या शासकीय कोव्हिडं रुग्णालयात ऑक्सीजन टॅंक उभारणी करून सर्व बेड ऑक्सीजन लाईन ने जोडले गेले तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहात महानगरपालिका वतीने तब्बल 260 ऑक्सीजन बेड ची व्यवस्था करून दिल्यावर त्या ठिकाणी मोफत उपचार होत असल्याचा विश्वास नागरीकांमध्ये  निर्माण करण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी झाल्याने रुग्ण स्वतःहून तपासणी साठी पुढे आले.

शहरात सुरू केलेल्या 30 मोहल्ला क्लिनिक कडून मोहल्ल्या मोहल्ल्यात तर शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी यांच्या 478 पथकांकडून घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात अनेक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर तात्काळ त्यांची तपासणी तर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना आरोग्य विभागाने अलगिकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश मिळाले असून सध्या शहरात कोविड रुग्णालयातील 90 टक्के बेड रिकामे असून शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात मालेगाव पॅटर्न अथवा मालेगाव काढा यांचा सहभाग किती या बाबत बोलताना डॉ पंकज आशिया यांनी कोरोना ला अटकाव फक्त प्रशासन करू शकत नसून राज्य केंद्र शासनाच्या आरोग्य विभागा कडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना भिवंडी शहरातील नागरीकांचे सहकार्य ,धार्मिक गुरू ,स्वयंसेवी संस्था ,पोलीस प्रशासन व इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉक्टर्स मंडळीं या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत असताना महानगरपालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामुहीक प्रयत्नातून आपण भिवंडी शहरातील कोरोना परिस्थितीती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो आहोत अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली.

 कोरोना काळात खाजगी रुग्णालयातून रुग्णाची उपचार करताना आर्थिक पिळवणूक केली गेली असल्याची संपूर्ण राज्यात ओरड होत असताना आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी शहरातील सहा खाजगी किविड रुग्णालयात रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलाची चौकशी टास्क फोर्स तर्फे करण्यात आली असून त्या बाबत संबंधित रुग्णालयां कडून खुलासा मागविल्या नंतर अनावश्यक असलेल्या बिलांचा परतावा संबंधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना देण्या बाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbhiwandiभिवंडी