शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

CoronaVirus News: भिवंडीत रुग्ण दुपट्टीचा कालावधी 130 दिवसांवर; आयुक्त पंकज आशिया यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 14:49 IST

शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी: राज्यात कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नसतांनाही भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणून रुग्ण दुपट्टीचा कालावधी तब्बल 130 दिवसांवर पोहचला असून ,राज्यात महानगरपालिका क्षेत्रात तो सर्वोत्तम असून भिवंडी शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती निवळण्यात प्रशासना सोबत शहरातील नागरीक ,पोलीस यंत्रणा ,सेवाभावी संस्था ,खाजगी डॉक्टर्स संघटना या सर्वांचे प्रयत्न कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे .

मुंबई ,पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना ठाणे ,कल्याण डोंबिवली , मीरा भाईंदर ,नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या व मृत्यु संख्या झपाट्याने वाढत असताना जुलै महिन्याच्या उत्तरार्थत नव्याने आयुक्त म्हणून रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पंकज आशिया यांनी अवलंबिलेल्या चार सूत्री उपाययोजना कामी आल्या असल्याने शहरातील कोरोनावर सध्यातरी नियंत्रण मिळविण्यात मनपा प्रशासनांसह आरोग्य विभागाला यश आले असल्याची माहिती मनपा आयुक्त आशिया यांनी दिली आहे.

कोरोनची परिस्थिती शहरात बिकट झाल्याने सुरुवातीला रुग्णांसाठी रुग्णालय व रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वप्रथम पाऊले उचलल्या नंतर आयजीएम या शासकीय कोव्हिडं रुग्णालयात ऑक्सीजन टॅंक उभारणी करून सर्व बेड ऑक्सीजन लाईन ने जोडले गेले तर शहरातील दोन सांस्कृतिक सभागृहात महानगरपालिका वतीने तब्बल 260 ऑक्सीजन बेड ची व्यवस्था करून दिल्यावर त्या ठिकाणी मोफत उपचार होत असल्याचा विश्वास नागरीकांमध्ये  निर्माण करण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी झाल्याने रुग्ण स्वतःहून तपासणी साठी पुढे आले.

शहरात सुरू केलेल्या 30 मोहल्ला क्लिनिक कडून मोहल्ल्या मोहल्ल्यात तर शिक्षक व महानगरपालिका कर्मचारी यांच्या 478 पथकांकडून घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात अनेक संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर तात्काळ त्यांची तपासणी तर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना आरोग्य विभागाने अलगिकरण केल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनास यश मिळाले असून सध्या शहरात कोविड रुग्णालयातील 90 टक्के बेड रिकामे असून शहरात 900 ऑक्सीजन सुविधा असलेले बेड उपलब्ध असून ते सध्या रिकामे असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा उपयोग होत आहे असे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले .

भिवंडी शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात मालेगाव पॅटर्न अथवा मालेगाव काढा यांचा सहभाग किती या बाबत बोलताना डॉ पंकज आशिया यांनी कोरोना ला अटकाव फक्त प्रशासन करू शकत नसून राज्य केंद्र शासनाच्या आरोग्य विभागा कडून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत असताना भिवंडी शहरातील नागरीकांचे सहकार्य ,धार्मिक गुरू ,स्वयंसेवी संस्था ,पोलीस प्रशासन व इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉक्टर्स मंडळीं या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत असताना महानगरपालिका कर्मचारी यांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत या सर्वांच्या सामुहीक प्रयत्नातून आपण भिवंडी शहरातील कोरोना परिस्थितीती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो आहोत अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली.

 कोरोना काळात खाजगी रुग्णालयातून रुग्णाची उपचार करताना आर्थिक पिळवणूक केली गेली असल्याची संपूर्ण राज्यात ओरड होत असताना आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी शहरातील सहा खाजगी किविड रुग्णालयात रुग्णांकडून वसूल केलेल्या बिलाची चौकशी टास्क फोर्स तर्फे करण्यात आली असून त्या बाबत संबंधित रुग्णालयां कडून खुलासा मागविल्या नंतर अनावश्यक असलेल्या बिलांचा परतावा संबंधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना देण्या बाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbhiwandiभिवंडी