शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

CoronaVirus News : रुग्ण दुपटीचा कालावधी १० दिवसांवरून ३० दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:20 IST

ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. एकूणच १५ दिवसांपूर्वी रुग्ण दरवाढ ही १० दिवसांवर होती.

अजित मांडके ठाणे : गेल्या १५ दिवसांमध्ये शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, रुग्ण दरवाढीचा (दुप्पट होण्याचा वेग) रेट १५ दिवसांपूर्वी १० टक्क्यांवर होता. तो आता सुधारून तब्बल २८.३ टक्क्यांवर आला आहे. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आणि मुंब्रा हे तीन रेड झोन होते. परंतु, याठिकाणी दरवाढीचा रेट कमालीचा वाढला आहे. लोकमान्यनगर भागात तो ४७.४ टक्के, वागळे प्रभाग समितीत ४०.९ टक्के आणि मुंब्य्रात ३९.९ टक्के झाला आहे. ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. एकूणच १५ दिवसांपूर्वी रुग्ण दरवाढ ही १० दिवसांवर होती. ती आता २९ दिवसांवर आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५७ टक्क्यांवर आले आहे. तर, मृत्यूदर ३.५ टक्क्यांवर आला असला, तरी तो महाराष्टÑ राज्यापेक्षा कमी असल्याची माहिती आयुक्त विजय सिंघल यांनी लोकमतला दिली.गेल्या काही दिवसांत शहरात कोरोनाची संख्या ही कमालीची वाढली आहे. परंतु, रुग्ण दरवाढीचा वेग २९ दिवसांवर नेण्यात आम्हाला यश आले आहे. रविवारपर्यंत ठाणे शहरात ६२९६ कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, यातही मागील काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही ३०९१ एवढी झाली आहे. तर, प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही २९९७ एवढी आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे आता ५७ टक्कयांवर आले आहे. त्यामुळे निश्चितच ही ठाण्यासाठी समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.>या उपाययोजनांमुळे रुग्णवाढ झाली कमीकोरोना दरवाढीचा वेग वाढत असताना महापालिकेने केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमुळे कोरोना वाढण्याचा कालावधी हा अवघ्या १५ दिवसांत १० दिवसांवरून २९ दिवसांवर आला आहे. यामध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना तत्काळ क्वारंटाइन करणे, एकाच्या बदल्यात १७ जणांना क्वारंटाइन करणे, हायरिस्कमधील रुग्णांची साखळी तोडणे, यासाठी टीम तयार करून ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण वाढत आहे, त्याठिकाणी हे काम करण्यात आले आहे. तसेच आता प्रत्येक दिवशी घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्याचे प्रमाण ३० हजार झाले आहे. त्यामध्ये ताप सर्वेक्षणही केले जात आहे. तसेच आॅक्सिजनची मात्राही तपासली जात आहे. त्यातून ज्यांना त्रास वाटत असेल, त्यांना तत्काळ क्वारंटाइन करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या सर्वांमुळे साखळी तोडण्यात मदत झाल्याचेही सिंघल यांनी स्पष्ट केले.>मुंबई मनपाच्या टास्कफोर्ससोबत कामतपासणीचे प्रमाणदेखील शहरात उत्तम असून, तपासणी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत जीआयआयएस प्रणाली कार्यान्वित केली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्कयांवर आले आहे. तर, मृत्यूदर हा महाराष्टÑापेक्षा ३.५० टक्के एवढा आहे. तो रोखण्यासाठी मुंबईतील टास्कफोर्सबरोबर महापालिक ा टास्कफोर्स काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी गुणाकाराने रुग्णवाढीचा (डबलिंगचा रेटचा कालावधीदेखील वाढला आहे. १५ दिवसांपूर्वी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १० दिवसांचा होता. त्यामुळे गुणाकाराने रुग्ण वाढल्याचे दिसून आले होते. परंतु, मागील काही दिवसांत आता हाच डबलिंगचा दर २८.३ दिवसांवर गेला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.>लोकमान्य-सावरकरनगरसह मुंब्य्रात समाधानकारक प्रगतीप्रभाग समितींचा विचार केल्यास लोकमान्य-सावरकरनगरमध्ये तो आता ४७.४ टक्के एवढा झाला आहे. याचाच अर्थ येथे रुग्णवाढ कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे. तर, मुंब्य्रातही रुग्ण दरवाढीचा वेग मागील १० दिवसांत कमी झाल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा रेट ३९.९ टक्के एवढा झाला आहे. दिव्यातही तो २६.१, वागळे इस्टेटमध्ये ४०.९, नौपाडा-कोपरीमध्ये २२.२, वर्तकनगर २१.६, उथळसर २८.७, कळवा १९.८, माजिवडा-मानपाडामध्ये डबलिंगचा रेट १५.२ टक्के एवढा आहे. एकूणच लोकमान्य, वागळे, मुंब्रा या प्रभाग समितींमधून कोरोनाबाधितांच्या डबलिंग रेटचा कालावधी हा आता वाढू लागल्याने समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या