शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

घरात थांबलो तर खायचं काय?; उपासमारीची वेळ आलेल्या नाका कामगारांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:47 IST

उल्हासनगरातील ५० हजार नाका कामगारांची अवस्था बिकट

उल्हासनगर : नाका कामगार व मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शिधा वाटप दुकानातून मोफत धान्य वाटप करा, अशी  मागणी कामगार नेते राधाकृष्ण साठे व शहर मनसेने थेट मुखमंत्री उद्धव ठाकरेंकडे निवेदनाद्वारे केली.उल्हासनगरात लहान व मोठे अनेक उधोग असून त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. कर्फ्यूमुळे त्यांच्या कामावर गदा येऊन त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली. हाताला काम नसल्याने दोन वेळ खायचे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला असून त्यांच्यासह कुटुंबाची उपासमार सुरू झाली. अशांना मदतीचा हात देण्याची तयारी विविध सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्त देशमुख यांना बोलून दाखवली. मात्र कोनोरा संसर्गाच्या भीतीने आयुक्ताने निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे. दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी अशा गरीब व गरजू कुटुंबाना शिधा वाटप दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.नाका कामगारासह मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची उपासमार होत असून त्यांना शासनासह सामाजिक संस्थेने वेळीच मदतीचा हात पुढे केला नाहीतर, महामारी पसरण्याची भीती कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी व्यक्त केली. शासन मदत करीत नसेलतर सामाजिक संस्थेना मदतीचा हात देण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने द्यावी. अशी मागणी साठे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. येत्या दोन दिवसात त्यांचा खाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाहीतर, शहरात वेगळीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस