शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : निर्बंधांमुळे डीजे, डेकोरेटरवाल्यांचा वाजला बॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 00:01 IST

CoronaVirus Lockdown : लग्नांबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचे कॅमिनियन असतात  (मुलांना धर्माची दीक्षा देणे) हे माणिकपूर, चुळणा, दिवानमानसह पश्चिम किनारपट्टीवर शेकडोच्या प्रमाणात होतात.

-  सुनील घरत

पारोळ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने पुन्हा एकदा लग्नसमारंभांवर निर्बंध आले असल्याने  त्याचा फटका वसई तालुक्यातील मंडप डेकोरेटर, डीजे यांना बसला असून, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, तर अनेक डेकोरेटर्सजवळील माणसे लाॅकडाऊनच्या भीतीने गावाला जाऊ लागल्याने त्याचाही फटका मंडप डेकोरेटर्सना बसू लागला आहे. याबरोबर या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायिकही देशोधडीला लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या वर्षीचा लग्नाचा हंगाम कोरोनाच्या महामारीमुळे वाया गेला असतानाच यावर्षी दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लग्नाचा हंगाम चांगला जाऊन थोडेफार उभे राहता येईल, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऐन लग्नसराईत लग्नसमारंभांवर अनेक निर्बंध  आले आहेत. त्याचा फटका मंडप डेकोरेटर, साउण्ड  सिस्टीमवाले, बॅण्डवाले, बँज्योवाले, वाटपे अशा व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या असंख्य कुटुंबांना बसू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने लग्नसमारंभासाठी फक्त ५० लोकांची  अट घालण्यात आल्याने मंडप लहान झाले, तर जेवणाची ऑर्डरही फक्त ५० लोकांची असल्याने खर्चही निघत नसल्याने त्याचा फटका आचारी लोकांना बसत आहे. लग्नांबरोबरच मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचे कॅमिनियन असतात  (मुलांना धर्माची दीक्षा देणे) हे माणिकपूर, चुळणा, दिवानमानसह पश्चिम किनारपट्टीवर शेकडोच्या प्रमाणात होतात. हा विधीही लग्नाप्रमाणेच होत असल्याने त्यावरही बंधने आल्याने त्याचा फटका मंडप डेकोरेटर्सना बसला आहे.

लॉकडाऊनची भीती, कामगार गावीगेल्या वर्षी तर मंडप डेकोरेटर्सनी कसे तरी आपल्याजवळील कामगारांना सावरले होते; परंतु आता लग्नसमारंभांवरच बंधने आल्याने त्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या भीतीने कामगारांनी गावाकडची वाट धरल्याने त्याचा फटकाही बसणार आहे. गेल्या वर्षभरात काम नसल्याने अनेक मंडप डेकोरेटर कर्जबाजारीपणामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातच काही महिन्यांपूर्वी मिळालेल्या मोठ्या ऑर्डर रद्द होत आहेत, तर काही ऑर्डर ५० लोकांच्याच मिळत असल्याने आता जगायचे कसे, असा प्रश्न यांच्यापुढे उभा राहिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर