शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात २३०१ कोरोना रुग्णांची वाढ; ५० जणांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 22:12 IST

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे‌. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे.

ठाणे - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे‌. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे.

ठाणे शहर परिसरात ६०१ रुग्ण आढळले असून आठ मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्णांची संख्या आता एक लाख २२ हजार ७९३ तर मृतांची संख्या एक हजार ७२५ नोंदली गेली आहे. कल्याण डोंबिवलीत ५८४ नव्याने वाढ होऊन १२ जणांचा आज मृत्यू झाला आहे. या मनपा क्षेत्रात एक लाख २४ हजार ७१३ रुग्णांस एक हजार ४९८ मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.

 उल्हासनगरमध्ये ४२ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आजपर्यंत १९ हजार २३९ रुग्णांची व ४४१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडी मनपा क्षेत्रात ३९ रुग्णांची वाढ व एक मृत्यू झाला. आतापर्यंत या शहरातल्या हजार दोन रुग्णांची आणि ४०१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरातही आज २५४ रुग्णांच्या वाढीसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ४५ हजार ३०० रुग्णांची व एक हजार ८६ मृत्यूची नोंद झाली आहे.

 अंबरनाथ शहरात १०१ रुग्ण वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातील आतापर्यंत १८ हजार २८५ रुग्ण संख्येसह ३९० मृतांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूर परिसरात ११२ बाधीत व एक मृत्यू नोंद झाला आहे. आतापर्यंत १९ हजार २९४ बाधीत व २०२ मृत्यू या शहरात झालेले आहेत. जिल्ह्यातील गांवपाड्यात आजही ३२० बाधीत आढळले असून सात मृत्यू झाले आहेत. यामुळे आजपर्यंत येथील २८ हजार ४५९ बाधीत व ७१८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे