शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

coronavirus: देवदर्शनाला गेलेले कुटुंब लॉकडाउनमुळे अडकून पडले, राज्य सरकारला घातले साकडे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:20 IST

अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.

अंबरनाथ : देवदर्शनासाठी गेलेले अंबरनाथमधील कुटुंब लॉकडाउनमुळे राजस्थानमध्ये अडकले आहे. या कुटुंबाला अंबरनाथमध्ये परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी होत आहे. अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.लॉकडाउनच्या काळात अजमेरला राहत असलेल्या ठिकाणी जेवणाचे हाल होत आहेत. याशिवाय आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत नाहीत, परत जाण्याविषयी विचारणा केल्यास कुणी धड उत्तर देत नाहीत. वैद्यकीय तपासणीसाठी गेलो तर योग्य सहकार्य मिळाले नाही. ज्याठिकाणी राहण्यास परवानगी मिळाली, त्याठिकाणी पाणी आणि वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आम्हाला लवकर अंबरनाथला नेण्याची व्यवस्थाकरा, अशी मागणी भाट यांनी केली आहे.ज्याप्रमाणे परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारने प्रयत्न करून मायदेशी परत आणले, त्याचप्रमाणे अजमेरला अडकलेल्या भाट कुटुंबीयांना राज्य सरकारने अंबरनाथला आणावे, अशा मागणीचे टिष्ट्वट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले.२१ मार्चपासून अजमेरात अंबरनाथ येथील भाट कुटुंबीयांचे २२ मार्च रोजी अजमेरहून अंबरनाथला परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र, २१ मार्चला देशभरात संचारबंदी लागू झाली आणि तेव्हापासून आम्ही अजमेरलाच अडकून पडलो आहोत, असे करण भाट यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे