शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

coronavirus: देवदर्शनाला गेलेले कुटुंब लॉकडाउनमुळे अडकून पडले, राज्य सरकारला घातले साकडे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:20 IST

अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.

अंबरनाथ : देवदर्शनासाठी गेलेले अंबरनाथमधील कुटुंब लॉकडाउनमुळे राजस्थानमध्ये अडकले आहे. या कुटुंबाला अंबरनाथमध्ये परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी मागणी होत आहे. अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात राहणारे करण भाट हे कुटुंबातील १८ सदस्यांसह १६ ते २२ मार्च दरम्यान राजस्थानमधील अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. यामध्ये महिला, वृद्ध तसेच लहान मुलांचा समावेश आहे.लॉकडाउनच्या काळात अजमेरला राहत असलेल्या ठिकाणी जेवणाचे हाल होत आहेत. याशिवाय आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत नाहीत, परत जाण्याविषयी विचारणा केल्यास कुणी धड उत्तर देत नाहीत. वैद्यकीय तपासणीसाठी गेलो तर योग्य सहकार्य मिळाले नाही. ज्याठिकाणी राहण्यास परवानगी मिळाली, त्याठिकाणी पाणी आणि वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आम्हाला लवकर अंबरनाथला नेण्याची व्यवस्थाकरा, अशी मागणी भाट यांनी केली आहे.ज्याप्रमाणे परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकारने प्रयत्न करून मायदेशी परत आणले, त्याचप्रमाणे अजमेरला अडकलेल्या भाट कुटुंबीयांना राज्य सरकारने अंबरनाथला आणावे, अशा मागणीचे टिष्ट्वट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले.२१ मार्चपासून अजमेरात अंबरनाथ येथील भाट कुटुंबीयांचे २२ मार्च रोजी अजमेरहून अंबरनाथला परतीच्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र, २१ मार्चला देशभरात संचारबंदी लागू झाली आणि तेव्हापासून आम्ही अजमेरलाच अडकून पडलो आहोत, असे करण भाट यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे