शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

Coronavirus: ‘टाटा आमंत्रा’मध्ये सुविधांची बोंब; चांगल्या सुविधा पुरवित असल्याचा केडीएमसीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:58 IST

डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील सागर्ली येथे राहणारी महिला एका रुग्णालयात आयाचे काम करते. पती, दोन मुले असा तिचा संसार. तिला लागण झाल्याने टाटा आमंत्रामध्ये ठेवण्यात आले.

मुरलीधर भवार 

कल्याण : भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथे क्वारंटाइन सेंटर तसेच संशयित आणि कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केली आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षदर्शींच्या मते वस्तुस्थिती वेगळीच आहे. येथील असुविधांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अगोदर कोरोनाचे भय आणि त्यात सुविधांची वानवा या कात्रीत सर्वसामान्य रुग्ण सापडले आहेत.

डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील सागर्ली येथे राहणारी महिला एका रुग्णालयात आयाचे काम करते. पती, दोन मुले असा तिचा संसार. तिला लागण झाल्याने टाटा आमंत्रामध्ये ठेवण्यात आले. त्या बऱ्या होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र लहान मुलाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा आठ दिवसांनी त्यांची रवानगी टाटा आमंत्रा येथे करण्यात आली. सगळ््या कुटुंबाला तेथेच क्वारंटाइन करण्यात आले. त्यांनी सांगितले की, मुलाला औषध दिले नाही. ताप, थंडी, सर्दी- खोकला झाला, तरी डॉक्टर येत नाहीत. एकदा रात्रीच्या जेवणात दिलेली भाजी पुन्हा सकाळी दिली. ती भाजी आंबलेली होती. गरम पाणी दिले गेले नाही. एक दिवस तर पाणीच नव्हते. पोळ््या नीट भाजलेल्या नसल्याने त्या खाणार कशा, असा सवाल त्यांनी केला.

शेजारच्या खोलीतील एका रुग्णाने सांगितले की, त्यांच्या गरोदर पत्नीला मुंबईतील गरोदर महिलांच्या कोविड रुग्णालयात ठेवले आहे. मात्र दोन वर्षाचा लहान मुलगा त्यांच्यासोबत क्वारंटाइन आहे. त्या मुलाला दूध दिलेले नाही. मुलाला व त्यांना तपासण्याकरीता डॉक्टर आलेले नाहीत. उंबर्डे येथे राहणाºया चालकास प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविले गेले. त्याठिकाणी कोविड रुग्ण होते. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना ‘टाटा’ला पाठविले गेले. पाच दिवस ठेवल्यावर मी स्वत: च्या मर्जीने घरी जात आहे, असे लिहून घेतले. निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट दिला नाही. गोळ््याही दिल्या नाहीत. त्यांना काही झालेच नव्हते तरी त्यांच्यासह कुटुंबीयांना १४ दिवस टाटात काढावे लागले. एका रुग्णाला चक्क घरातून बिºहाड घेऊन या, असे सांगितले. बेड नसल्याने जमिनीवर झोपण्याची वेळ आली. त्यानंतर त्याला बेड दिला. शनिवारी पाणी आलेच नाही. त्यामुळे प्रातर्विधी कसा उरकायचा, असा प्रश्न निर्माण झाला. पिण्यासाठीही पाणी नव्हते. एका रुग्णाने अस्वच्छतेचा व्हिडीओ काढून व्हायरल केला होता. कोविड रुग्णांना फळे दिली जात नाही. पोळ््या नीट भाजलेल्या नसतात, अशा तक्रारी रुग्णांनी केल्या.क्वारंटाइनसाठी ५१५ खोल्या आणि १०३० बेडची सुविधा आहे. कोविड रुग्णांकरिता ७०० खोल्या आणि १४०० बेडची सुविधा आहे. दररोज १८०० जणांचे जेवण व नाश्ता केला जातो. शेवटच्या रुग्णाला जेवण पोहोचेपर्यंत थंड होते. मात्र जेवण ताजे दिले जाते. शनिवारी स्टेमचा पाणीपुरवठा बंद होता. रुग्णांनी नळ चालू ठेवल्यामुळे पाणी वाया गेले. - घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता, टाटा आमंत्रा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका