शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कार्यालयात पोहोचण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे द्राविडी प्राणायाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 12:42 IST

विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे.

- योगेश बिडवई

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉक डाऊननंतर मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातून बेस्ट तसेच इतर एसटी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र ही सेवा त्यांच्यासाठी पुरेशी नसल्याचे चित्र आहे. कार्यालयात पोहोचण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सर्कस करावी लागत आहे. 

विशेषतः मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातून मुंबईत जाताना फरफट होत आहे. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कल्याण बस स्थानकाबाहेर मुंबईत जाण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसेसची व्यवस्था आहे. मात्र शुक्रवारी 12 वाजता मुंबईकडे जाणाऱ्या कल्याणच्या मुख्य बस स्टॉपवर गोंधळ सुरू होता. नायर रुग्णालयाच्या काही महिला कर्मचाऱ्यांना घेऊन न जाता बस रवाना झाली होती. कल्याणच्या वेगवेगळ्या भागातून पायपीट करत कर्मचारी बस स्टॉपवर येतात. मात्र काहींनी बस भरलेली नसताना आधीच नेल्याचे या महिलांनी सांगितले. बस स्टॉपवरून के.ई.एम रुग्णालय, जे जे रुग्णालय, टाटा रुग्णालय आदी ठिकाणी परिचारिकांसह इतर कर्मचारी रोज जातात. मात्र त्यांची संख्या आणि उपलब्ध बसेस यांचे गणित व्यस्त आहे. बस चुकल्यास दुसऱ्या बसमध्येही त्यांना घेतले जात नाही. 

साडेबाराच्या दरम्यान मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचारी,  पोलीस कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम संपवून घरी परतत होते. कल्याणला या बसमधील काही कर्मचारी उतरले. उर्वरीत कर्मचारी बदलापूरपर्यंतच्या मार्गावरील होते. या बसमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबलेले होते. 50 पेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये होते. त्यात काही उभे होते. एकीकडे गर्दी करू नका, असे सर्वसामान्यांना सांगितले जाते. मात्र कोरोनाच्या नियमांची सरकारी कर्मचाऱ्यांकडून पायमल्ली सुरू असल्याचे चित्र होते. या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली येथून कर्मचारी दररोज असेच अडचणींचा सामना करत मुंबईत कार्यालयात पोहोचतात आणि गर्दीत घरी येतात. 

वांद्रे, प्रतिक्षा नगर, सांताक्रुझ, वडाळा येथील आगाराच्या बस कल्याण, डोंबिवली परिसरात येतात. अनेकांना मुंबईत कार्यालयात पोहोचण्यासाठी दोन तीन वेळा बस बदलावी लागते. मात्र आम्ही अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर जाणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

दुपारी एक वाजता नायर रुग्णालयात पोहोचण्यासाठी 20-25 कर्मचारी एक वाजेच्या बसची वाट पाहत होते. मात्र दीड वाजेपर्यंत वडाळा आगाराची बस अालेली नव्हती. काहींना सलग 24 तासांची म्हणजे दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी तीनपर्यंत तर काहींना 12 तासांची ड्युटी असल्याचे नायर रुग्णालयाच्या कर्मचारी ज्योती कदम यांनी सांगितले. मात्र सुविधांचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आमची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाकार्यालयाकडून आम्हाला हॅण्ड सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले नसल्याचे अनेकांनी सांगितले. आमची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, असेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

आम्हाला बसच्या ड्रायव्हर किंवा कंडक्टरचा मोबाईल नंबर दिलेला नाही. बसची वाट पाहण्यापलिकडे आम्हाला मार्ग नाही. कल्याणहून मुंबईत जाताना रोज अडचणी येतात. 

- गौस शेख, सुरक्षा कर्मचारी, नायर रूग्णालय, मुंबई

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस