शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हॉटेल-बार बंदची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 1:28 AM

शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.

ठाणे : मुंबईस लागून असलेल्या ठाणे शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यावरील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनासह डॉक्टरांकडून सर्वपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरांत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्यावाढती आहे. त्यांच्या या संपर्कामुळे हा संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेत ते बंद करण्याची मागणी होत आहे.सामाजिक जबाबदारीचे भान राखून गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने आधीच केले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील कार्यक्रम थांबवले आहेत. गुढीपाडव्याच्या मिरवणुकाही आयोजकांनी रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर मंदिरांमधील भक्तांची गर्दी टाळण्यासाठी संबंधित व्यवस्थापकांनी मंदिरेदेखील बंद ठेवण्याचे नियोजन केले. या उपाययोजनांच्या दृष्टीने बार, रेस्टॉरंट, हॉटेलमधील ग्राहकांची गर्दी रोखण्यासाठी ते काही दिवस बंद करण्याच्या दृष्टीने सामाजिक संघटना पुढे येण्याच्या प्रयत्नात आहेत.कोरोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या सातवर गेली आहे. डॉक्टरांच्या निगराणीतील या रुग्णांना मासिक आधार देऊन या संकटातून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.कोरोनाच्या या संकटाला राष्टÑीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापनाचा कायदा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लागू केला आहे.दूरध्वनीद्वारे मार्गदर्शननागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात सिव्हिल रुग्णालयातील परिचारिका नागरिकांच्या दूरध्वनींना उत्तरे देत आहेत. आतापर्यंत चार दूरध्वनी येऊन त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये परदेशातून आलेल्या मात्र दरवाजा बंद करून राहत असलेल्यांची माहिती दिल्याचे परिचारिकांनी सांगितले. तर उपाययोजनेच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्याभरातून फोन येत असल्याचेही सांगितले जात आहे. बार रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ते बंद करण्याची मागणी जोर धरत आहे, यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.हॉटेल, बार, रेस्टॉरंट बंद केल्यास सकाळी घर सोडलेल्यांच्या खाण्यापिण्याचे वांधे होतील; पण ठिकठिकाणच्या रेस्टॉरंटमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॉन्सपोर्ट बंद करावे लागेल. यामुळे नागरिक अन्य शहरात जाणे टाळतील आणि रेस्टॉरंटमधील गर्दी कमी होईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेल