शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

coronavirus: रेमडेसिव्हिर औषधांच्या निविदा प्रक्रियेला महिनाभराचा विलंब, काळाबाजार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:29 IST

कोरोनाग्रस्त अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरण्यात येत असलेले ‘रेमडेसिव्हिर’ हे इंजेक्शन सध्या मोलाची मदत करीत आहे.

ठाणे : दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी उपापयोजना करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. कोरोनाग्रस्त अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरण्यात येत असलेले ‘रेमडेसिव्हिर’ हे इंजेक्शन सध्या मोलाची मदत करीत आहे. आता दोन महिने उलटल्यानंतर या इंजेक्शनच्या निविदा प्रक्रियेला पालिकेने सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात हे औषध मिळेपर्यंत जास्त कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. गेल्या दीड महिन्यात महापालिकेने ही प्रक्रि या का राबविली नाही, असा सवाल मनसेने केला आहे.ठाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुश्की ओढवली. मे महिन्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने भेटी देऊन मृत्युदर कमी करण्यासंदर्भात महापौर आणि आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर मुंबई महापालिकेने तत्काळ निविदा काढल्यामुळे सध्या मुंबईत रेमडेसिव्हिर इंजेक्शन काही प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचवेळी ठाणे महापालिकेनेही निविदा काढली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते, असा आरोप मनसेने केला आहे. पण, महापालिकेच्या कारभारामुळे ठाणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ४४५ रुग्णांना जीव गमवावा लागला असून, कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक गंभीर रुग्ण आहेत, ज्यांना या औषधाची गरज आहे. पण, त्यांना हे औषध मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनाही रुग्णाचा जीव वाचविण्यात अपयश येत आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी फक्त कागदी घोडे नाचविण्यापेक्षा आयुक्तांनी हे औषध वेळीच उपलब्ध करावे, अशी मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.सिप्ला, हिटेरो या दोन कंपन्यांकडून रेमडेसिव्हिर या औषधाचे उत्पादन केले जाते. ते काही ठिकाणी विक्रेत्यांना न देता थेट रुग्णालयांना पुरविण्यात येत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे औषधाच्या मागणीतही वाढ झाली आहे. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत सध्या पाच हजार ४०० इतकी आहे. वाढत्या मागणीमुळे या औषधांचाही काळाबाजार सुरू झाला आहे.याचबरोबर टोसीलिझुमॅब नावाचे दुसरे महागडे इंजेक्शन काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांना दिले जात आहे. त्याची किंमत21,000ते ३२ हजारांच्या घरात आहे. पण, या औषधांचा काळाबाजार होत असल्याने ते वाढीव दराने विक्र ी होत आहे. ठाण्यातील रुग्णांना हे औषध लवकर उपलब्ध होत असताना काळाबाजार होणार नाही, याचीही दक्षता पालिकेने वेळीच घेणे आवश्यक असल्याचेही महिंद्रकर यांनी सांगितले.रेमडेसिव्हिर औषध हे ठाणे महानगरपालिकेच्या रु ग्णांना लागले, तर त्यासाठी त्यांना प्रतिव्हायल चार हजार १५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे औषध मुंबई महानगरपालिकेच्या रु ग्णालयांतील रुग्णांना मोफत मिळणार आहे. ठाणेकर नागरिकांना पुरेशा डोससाठी २० हजार ते २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सद्य:स्थितीत हे औषध ठाण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे