शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

Coronavirus : कल्याण ग्रामीणमध्ये लग्नसोहळ्यांना होतेय गर्दी, तहसीलदारांचा कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:37 IST

अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.

टिटवाळा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कल्याण तालुक्यात ग्रामीण भागात विवाहसोहळ्यांची धामधूम जोरात सुरू आहे. या सोहळ्यांना गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.गुरुवार, १९ मार्चला ग्रामीण भागात गावागावांत विवाहसोहळ्यांची धामधूम सुरू होती. या सोहळ्यांना शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमत असल्यामुळे चिंताजनक बाब आहे. याकडे पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या धोक्याविषयी जनजागृती आणि उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. कुठे कुठे एखादा फलक दिसत आहे. तर प्राथमिक आरोग्यकेंद्राचे अधिकारीही गायब असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले. सोहळे-समारंभांना वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती चिघळू शकते, अशी भीती नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली.विवाह सोहळ्यांत दिसणारी गर्दी अशीच राहिली तर कोरोना आजार पसरण्यास मदत होईल, हे धोकादायक आहे. गर्दी टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे.- डॉ. राम मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी.कोरोना आजाराची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. गर्दी टाळावी आणि केंद्र आणि राज्य सरकारलासहकार्य करावे.- आमदार किसन कथोरे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्नthaneठाणे