शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कल्याण ग्रामीणमध्ये लग्नसोहळ्यांना होतेय गर्दी, तहसीलदारांचा कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:37 IST

अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.

टिटवाळा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कल्याण तालुक्यात ग्रामीण भागात विवाहसोहळ्यांची धामधूम जोरात सुरू आहे. या सोहळ्यांना गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.गुरुवार, १९ मार्चला ग्रामीण भागात गावागावांत विवाहसोहळ्यांची धामधूम सुरू होती. या सोहळ्यांना शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमत असल्यामुळे चिंताजनक बाब आहे. याकडे पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या धोक्याविषयी जनजागृती आणि उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. कुठे कुठे एखादा फलक दिसत आहे. तर प्राथमिक आरोग्यकेंद्राचे अधिकारीही गायब असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले. सोहळे-समारंभांना वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती चिघळू शकते, अशी भीती नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली.विवाह सोहळ्यांत दिसणारी गर्दी अशीच राहिली तर कोरोना आजार पसरण्यास मदत होईल, हे धोकादायक आहे. गर्दी टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे.- डॉ. राम मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी.कोरोना आजाराची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. गर्दी टाळावी आणि केंद्र आणि राज्य सरकारलासहकार्य करावे.- आमदार किसन कथोरे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्नthaneठाणे