शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 12:32 IST

भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देभिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेकांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

मुंबई : विविधतेत एकता जपणाऱ्या, जोपासणाऱ्या आपल्या देशात अनेक धर्म, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. संकटसमयी मदतीला धावणं ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. सध्याच्या कोरोना काळात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी गरजूंच्या मदतीसाठी आपली दारं उघडली आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

भिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. हे चित्र पाहून, शांतीनगर भागातील जमात-ए-इस्लामीच्या मक्का मशिदीत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलं आहे. येथे कुठल्याही धर्माच्या रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन नि:शुल्क उपलब्ध करून दिला जातोय. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.

ज्या रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाही, त्यांना या कोविड केंद्रात दाखल करून घेतो. ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास त्यांना २ ते ४ तास ऑक्सिजन सपोर्ट दिला जातो. त्यानंतर बरं वाटू लागल्यास आणि रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यास ते तिथे जाऊन उपचार घेतात, अशी माहिती जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष मौलाना औसफ फलानी आणि विश्वस्त शेख रियाझ ताहीर यांनी दिली.

याआधी, पुण्यात आझम कॅम्पस परिसरातील मशिदीचा एक मजला आयसोलेशन व क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आला आहे. तिथे ८० बेड्सची व्यवस्था आहे. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या जामा मशिदमध्ये १५० व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था आहे.

शेगावमध्ये ‘आनंद विसावा’

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण हे लक्षात घेत, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानकडूनही ५०० खाटांचा कक्ष क्वारंटाइन कक्ष म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आनंद विसावा या प्रशस्त कक्षात कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी क्वारंटीन असलेल्या लोकांना संस्थानकडून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात संस्थानकडून दररोज दोन हजार भोजन पाकिटांचे वितरणही करण्यात येत होते.

दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट ने कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांना अन्नधान्न्याची किट उपलब्ध करून दिली, तसेच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित केली.

कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोरोना काळात दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील गरीब फेरीवाले, जोतिबा मंदिर परिसरातील गरीब दुकानदार, नाभिक समाज, तृतीयपंथी, वारांगणा, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ, ऑर्केस्ट्रातील कलावंत यांना धान्याचे किट वाटप केले आहे. रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना धान्यांचे किट वाटप करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने कोरोनाचा फटका बसलेल्या हजारो लोकांना जेवण आणि अन्नधान्य, अशी मदत केली आहे. भिक्षू, भटके, हातावर ज्यांचे पोट आहेत, अशा अनेकांना मठाकडून मदत पोहोचविली गेली. कोल्हापूर पोलीस दलाला रोज मठाच्या वतीने जेवण पुरवण्यात येत आहे. गोंदवलेकर महाराज संस्थाननेही भरीव आर्थिक मदत आणि धान्यवाटप करून गरजूंना आधार दिला.

कोल्हापूरातील वाईल्डर मेमोरियल चर्चतर्फे कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.

चर्चने उघडली शाळेची इमारत

माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वास्तव्य करता यावे म्हणून सेंट मायकल चर्चने शाळेच्या इमारतीतील खोल्यांचं घरांमध्ये रूपांतर केलं होतं. या केंद्रामध्ये पन्नासहून अधिक नर्स आणि कर्मचारी तब्बल ६ आठवडे वास्तव्य करत होते. यांच्या व्यतिरिक्त पोलिसांच्या वास्तव्याची देखील येथे व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, वांद्रे येथील सेंट पीटर्स चर्चने देखील स्थलांतरित कामगारांच्या राहण्यासाठीची व्यवस्था केली होती.

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याbhiwandiभिवंडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस