शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

coronavirus: भिवंडीतील मशिदीत कोविड केअर सेंटर, सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 12:32 IST

भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देभिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेकांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

मुंबई : विविधतेत एकता जपणाऱ्या, जोपासणाऱ्या आपल्या देशात अनेक धर्म, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. संकटसमयी मदतीला धावणं ही शिकवण प्रत्येक धर्म देतो. सध्याच्या कोरोना काळात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी गरजूंच्या मदतीसाठी आपली दारं उघडली आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये मशिदीचं रूपांतर तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. धर्म-पंथाचं बंधन न ठेवता तिथे कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात आहेत.

भिवंडीत बाधितांची संख्या १३०० हून अधिक आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी भिवंडीबाहेर जावं लागतंय. हे चित्र पाहून, शांतीनगर भागातील जमात-ए-इस्लामीच्या मक्का मशिदीत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलं आहे. येथे कुठल्याही धर्माच्या रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन नि:शुल्क उपलब्ध करून दिला जातोय. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.

ज्या रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाही, त्यांना या कोविड केंद्रात दाखल करून घेतो. ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास त्यांना २ ते ४ तास ऑक्सिजन सपोर्ट दिला जातो. त्यानंतर बरं वाटू लागल्यास आणि रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यास ते तिथे जाऊन उपचार घेतात, अशी माहिती जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष मौलाना औसफ फलानी आणि विश्वस्त शेख रियाझ ताहीर यांनी दिली.

याआधी, पुण्यात आझम कॅम्पस परिसरातील मशिदीचा एक मजला आयसोलेशन व क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आला आहे. तिथे ८० बेड्सची व्यवस्था आहे. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठ्या जामा मशिदमध्ये १५० व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था आहे.

शेगावमध्ये ‘आनंद विसावा’

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण हे लक्षात घेत, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानकडूनही ५०० खाटांचा कक्ष क्वारंटाइन कक्ष म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे. आनंद विसावा या प्रशस्त कक्षात कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी क्वारंटीन असलेल्या लोकांना संस्थानकडून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात संस्थानकडून दररोज दोन हजार भोजन पाकिटांचे वितरणही करण्यात येत होते.

दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट ने कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबांना अन्नधान्न्याची किट उपलब्ध करून दिली, तसेच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित केली.

कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोरोना काळात दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील गरीब फेरीवाले, जोतिबा मंदिर परिसरातील गरीब दुकानदार, नाभिक समाज, तृतीयपंथी, वारांगणा, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञ, ऑर्केस्ट्रातील कलावंत यांना धान्याचे किट वाटप केले आहे. रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना धान्यांचे किट वाटप करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने कोरोनाचा फटका बसलेल्या हजारो लोकांना जेवण आणि अन्नधान्य, अशी मदत केली आहे. भिक्षू, भटके, हातावर ज्यांचे पोट आहेत, अशा अनेकांना मठाकडून मदत पोहोचविली गेली. कोल्हापूर पोलीस दलाला रोज मठाच्या वतीने जेवण पुरवण्यात येत आहे. गोंदवलेकर महाराज संस्थाननेही भरीव आर्थिक मदत आणि धान्यवाटप करून गरजूंना आधार दिला.

कोल्हापूरातील वाईल्डर मेमोरियल चर्चतर्फे कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.

चर्चने उघडली शाळेची इमारत

माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णांची सेवा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वास्तव्य करता यावे म्हणून सेंट मायकल चर्चने शाळेच्या इमारतीतील खोल्यांचं घरांमध्ये रूपांतर केलं होतं. या केंद्रामध्ये पन्नासहून अधिक नर्स आणि कर्मचारी तब्बल ६ आठवडे वास्तव्य करत होते. यांच्या व्यतिरिक्त पोलिसांच्या वास्तव्याची देखील येथे व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, वांद्रे येथील सेंट पीटर्स चर्चने देखील स्थलांतरित कामगारांच्या राहण्यासाठीची व्यवस्था केली होती.

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याbhiwandiभिवंडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस