शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus: कोरोनाच्या नियमांना कात्रजचा घाट; ठाणे शहरात कडक लॉकडाऊनचीच गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:31 IST

गेल्यावर्षी नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली होती. पण, आता किती दिवस घाबरून घरात बसायचे, असा विचार करून सामान्य माणूस घराबाहेर पडू लागला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक चणचण जाणवू लागल्याने घर कसे चालवायचे, अशी चिंता सामान्यांना वाटू लागली. यातूनच नागरिक बिनधास्त फिरत आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. यापार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमांचे पालन कितपत होते, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

अजित मांडके/नितीन पंडितठाणे  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने नियमावली तयार केलेली आहे. परंतु त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आजही गर्दी दिसत आहे. रिक्षांमध्ये दोनच प्रवासी घेण्याचा नियम असतानाही तीन ते पाच प्रवासी बसवले जात आहेत. परिवहनच्या बसमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातल्या त्यात हॉटेलचालक मात्र रात्री साडेअकरा वाजता शटर डाऊन करुन पालिकेला सहकार्य करत असल्याचे दिसत आहे. परंतु येऊर, घोडबंदर भागातील ढाबे रात्री एक ते दोनपर्यंत सुरू असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच परिस्थिती पाहता ठाण्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. 

महापालिका हद्दीत मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. या रुग्णांसाठी पालिकेने कोविड सेंटरमध्ये ४ हजार २२१ बेड आरक्षित केले आहेत. त्यानुसार मागील १९ दिवसांत शहरात ५ हजार ८८० रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत शहरात ३०० ते ५०० रुग्ण दिवसाला आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंध आणखी कडक करण्यास सुरुवात केली आहे. ठाणेकरांना मात्र याची तमाच नसल्याचे पाहणीत दिसून आले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. रिक्षातून दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तीन प्रवासी घेऊन जातात, तर शेअर रिक्षांवर जास्तीचे प्रवासी नेल्यास कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवासी आजही वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत नेले जात आहेत. दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून एका सीटवर एक प्रवासी असे स्पष्ट करण्यात आले असतानाही बस भरून जाताना दिसतात. इतरांचे सोडा, महानगरपालिकेची व्यवस्थाच नियमांचे पालन करत नसेल, तर त्यावर कोण कारवाई करणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. 

भिवंडी

काही दिवसांपूर्वी कमी झालेल्या कोरोनाने मार्च महिन्यात डोके वर काढायला सुरुवात केली आहे. भिवंडीतही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात आटोक्यात असलेला कोरोना हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत रोज पाच ते सात असलेली रुग्णसंख्या मार्च महिन्यात दुपटीने वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात भिवंडी शहरातील रुग्णसंख्या १६६ वर पोहोचली, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही २०५ दिवसांवर आला आहे. 

इतर शहरांच्या तुलनेने भिवंडीत रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात आली असली तरी भिवंडीकरांकडून कोरोना नियमांचे फारसे पालन होताना दिसत नाही हे वास्तव आहे. विशेष म्हणजे पोलीस व मनपाच्या दंडवसुली मोहिमेमुळे नागरिक कोरोना नियमांचे पालन करत असून शहरातील सार्वजनिक उत्सव व लग्न समारंभात फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. मात्र शहरात असलेल्या सर्वच भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करताना दिसतात. 

शहरातील काही हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन केले जात असले तरी शहराजवळ व महामार्गांवर असलेल्या ढाब्यांवर मात्र रात्री गर्दी दिसते. त्यातही काही ढाब्यांवार मोकळी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मालकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे, तर काही ठिकाणी तीनतेरा वाजलेले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस