शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Coronavirus: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनावर ५६ जणांची मात; एकाच दिवशी परतले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 01:41 IST

जोशी रुग्णालयात साजरा झाला आनंदोत्सव

मीरा रोड : भाईंदरच्या जोशी रुग्णालयातून शनिवारी ५६ कोरोनामुक्त झालेल्या रु ग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे रुग्णालयात जणू आनंदोत्सवच साजरा केला. शहरातही आनंदाचे वातावरण आहे. एकूण १६१ पैकी तब्बल १०१ रु ग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे रोजचा दिवस चिंतेच्या छायेत जात असताना शनिवार मात्र शहरात आनंद घेऊन आला.भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याने दाखल असलेल्या रु ग्णांपैकी ५६ रु ग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त चंद्रकांत डांगे, उपमहापौर हसमुख गेहलोत, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब अरसूलकर यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षारक्षक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी घरी जाणाऱ्या रु ग्णांना टाळ््यांच्या गजरात निरोप दिला. रुग्णालयात मोठे आनंदाचे वातावरण होते. कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णांनीही उपस्थित सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आदींचे आभार मानले.

रुग्णालयात सर्वांनी चांगली काळजी घेतली असे सांगत अनेकांनी हात जोडून वैद्यकीय सेवा बजावणाºया या देवदूतांना अभिवादन केले.भार्इंदरच्या नारायण नगरमधील तीन वर्षांची मुलगीही आईबरोबर कोरोना मुक्त होऊन घरी गेली. पालिकेच्या रु ग्णवाहिकांमधून सर्वांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांचेही रहिवाशांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. जोशी रुग्णालय पालिकेने कोरोना रु ग्णालय जाहीर करायच्या आधीपासून येथे आवश्यक सुविधा देण्याची तयारी सुरू केली होती. पालिका प्रशासनासह आयुक्त डांगे, आमदार जैन, डॉ. अजय संख्ये, डॉ. अरसूलकर आदींनी आयसीयू, व्हेंटिलेटरची सुविधा तसेच रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टींसाठी नियोजन केले होते. डॉ. प्रफुल्ल सामंत, डॉ. तेजस्वी सोनवणे, डॉ. जाधव आदींची टीम उपचारासाठी बनवली होती. या टीमचा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कचा चांगला परिणाम असल्याचे सांगण्यात आले.आजचा दिवस शहरासाठी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. ५६ रु ग्णांना आज बरे करून पाठवले, याचा आनंद आहे. नागरिकांचे सहकार्य आहे. १०१ रु ग्ण बरे झाले असून ५७ रु ग्ण आहेत. तेही लवकर बरे होतील. - चंद्रकांत डांगे, आयुक्त

रु ग्णालयात डॉक्टरांपासून अगदी स्वच्छता करणाºया प्रत्येकाने आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रु ग्णांचे उपचार व सेवा केली. आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन काही कमी पडू दिले नाही. डॉक्टरांची समिती नियमित प्रत्येक केसनुसार चर्चा करून निर्णय घेत आहेत. कोरोना चाचणीचे विलंबाने मिळणारे अहवाल लवकर मिळू लागल्याने पटकन उपचार शक्य झाले. - डॉ. बाळासाहेब अरसूलकर, जोशी रुग्णालय प्रमुख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या