शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती गंभीर - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 06:23 IST

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेतील महापालिकेने अधिग्रहित केलेल्या होलिक्रास कोविड रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेतील महापालिकेने अधिग्रहित केलेल्या होलिक्रास कोविड रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप गटनेते शैलेश धात्रक आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, रुग्ण संख्या वाढत असताना येथे आॅक्सिजन बेड आणि आयसीयूची कमतरता आहे. तसेच व्हेंटिलेटरही कमी आहेत. आयसीयू बेडचे फोर्टीज रुग्णालय आयुक्त टेकओव्हर करणार आहेत. त्याचबरोबर आॅक्सिजन व आयसीयू बेडची संख्या वाढवण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांच्या चाचण्या तातडीने घेतल्या पाहिजेत. त्यांचे रिपोर्ट हे तीन दिवसांनी मिळतात. इतका कालावधी लागण्याचे कारण नाही. या कालावधीत पॉझिटिव्ह रुग्णाकडून अन्य रुग्णांना लागण होऊ शकते. २४ तासांच्या आत प्रशासकीय यंत्रणा व रुग्णाला त्याचा अहवाल मिळाला पाहिजे.महापालिकेकडे कोविड लढ्यासाठी आरोग्य कर्मचारी कमी आहेत. राज्य सरकारने आरोग्य कर्मचारी महापालिकेस दिले पाहिजेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी तोकडी असल्याने राज्य सरकारने कल्याण-डोंबिवलीची गंभीर दखल घेऊन त्यात लक्ष घातले पाहिजे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.भाजपला आंदोलनाचा विसर२३ जुलै रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही कोरोनाचा आढावा घेतला होता. तेव्हा आरोग्य यंत्रणा थिटी असल्याचे भाष्य करून दहा दिवसाची डेडलाइन आयुक्तांना दिली होती. या कालावधीत स्थिती सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा भाजपला विसर पडल्याचे आजच्या भेटी दरम्यान दिसून आले.‘महागड्या गाड्यांपेक्षा आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे’भिवंडी : राज्य सरकारने महागड्या गाड्या खरेदीपेक्षा पोलिसांचे वेतन, आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असा चिमटा फडणवीस यांना रविवारी ठाकरे सरकारला काढला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी येथील इंदिरा गांधी कोविड रुग्णालयाला भेट देत येथील व्यवस्थेची माहिती घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस