शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:58 IST

एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. मागील १५ दिवसांत २,६६० रुग्ण सापडले असून, ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.लॉकडाऊन असेपर्यंत केडीएमसी हद्दीत रुग्णांचे प्रमाण मर्यादित होते. मात्र, ८ जूनला अनलॉक झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे शहरात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी १० वरून ३० दिवसांवर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के असले तरी, रुग्ण दुपटीचा कालावाधी ९ ते १० दिवसांचा आहे.केडीएमसी हद्दीत ९ जूनपर्यंत १,५६२ रुग्ण होते. तर, यातील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, मागील १५ दिवसांत रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. २,६६० रुग्णांमधील ७० ते ८० टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तरुणांचा वयोगट ३० ते ४५ वर्षांदरम्यानचा आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये ६२ ते ९२ वयोगटांतील व्यक्ती असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस, किडनीचे आजार आहेत.दरम्यान, बुधवारपर्यंत कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १,३१७, पूर्वेत १,०५८, डोंबिवली पूर्वेत ९१५, पश्चिमेत ५८७, मांडा-टिटवाळा-मोहने ३०७, तर, पिसवली भागात आठ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४,१९२ पर्यंत पोहोचली असून, यातील ८५ जणांचा बळी गेला आहे. तर, १,६८८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, सध्या २,४१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात दररोज ५० ते ७० पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, अनलॉक झाल्यानंतर प्रतिदिन किमान ७२ ते कमाल २५६ पर्यंत रुग्ण सापडले आहेत.अनलॉक १ मध्ये नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. सुरुवातीला केडीएमसी हद्दीतून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणाऱ्यांकडून कोरोना संक्रमित होत असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले होते. परंतु, आता शहरातील सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन केले पाहिजे. आपण प्रत्येक जण आता कोरोना योद्धा आहोत, ही भावना आत्मसात करून खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.>कोरोना चाचणीच्या प्रमाणात वाढकेडीएमसीने कल्याण-डोंबिवलीत घरोघरी ताप सर्वेक्षण तसेच कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे.सध्या प्रतिदिन ४०० ते ४५० चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याचीही संशयित रुग्णांची तक्रार आहे.खाजगी लॅबमध्ये करणाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने अहवालास विलंब होत आहे.कोरोनाची चाचणी दिल्यानंतर अहवाल मिळेपर्यंत त्यांनी घरातच क्वारंटाइन होणे महत्त्वाचे आहे.अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. नागरिकांनी नियमही पाळावे.>‘ते’ काम अंतिम टप्प्यात : रुग्णालयांत खाटांअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधींकडून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात २०० बेड उभारणीचे काम सुरू केले आहे. ते काम ९५ टक्के पूर्ण झाले. लवकरच तेथे रुग्णांवर उपचार सुरू होतील. दरम्यान, कल्याणमधील फडके मैदानातही ५५० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, अद्याप तेथे कोणतेही काम सुरू झालेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस