शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:58 IST

एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. मागील १५ दिवसांत २,६६० रुग्ण सापडले असून, ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.लॉकडाऊन असेपर्यंत केडीएमसी हद्दीत रुग्णांचे प्रमाण मर्यादित होते. मात्र, ८ जूनला अनलॉक झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे शहरात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी १० वरून ३० दिवसांवर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के असले तरी, रुग्ण दुपटीचा कालावाधी ९ ते १० दिवसांचा आहे.केडीएमसी हद्दीत ९ जूनपर्यंत १,५६२ रुग्ण होते. तर, यातील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, मागील १५ दिवसांत रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. २,६६० रुग्णांमधील ७० ते ८० टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तरुणांचा वयोगट ३० ते ४५ वर्षांदरम्यानचा आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये ६२ ते ९२ वयोगटांतील व्यक्ती असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस, किडनीचे आजार आहेत.दरम्यान, बुधवारपर्यंत कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १,३१७, पूर्वेत १,०५८, डोंबिवली पूर्वेत ९१५, पश्चिमेत ५८७, मांडा-टिटवाळा-मोहने ३०७, तर, पिसवली भागात आठ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४,१९२ पर्यंत पोहोचली असून, यातील ८५ जणांचा बळी गेला आहे. तर, १,६८८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, सध्या २,४१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात दररोज ५० ते ७० पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, अनलॉक झाल्यानंतर प्रतिदिन किमान ७२ ते कमाल २५६ पर्यंत रुग्ण सापडले आहेत.अनलॉक १ मध्ये नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. सुरुवातीला केडीएमसी हद्दीतून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणाऱ्यांकडून कोरोना संक्रमित होत असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले होते. परंतु, आता शहरातील सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन केले पाहिजे. आपण प्रत्येक जण आता कोरोना योद्धा आहोत, ही भावना आत्मसात करून खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.>कोरोना चाचणीच्या प्रमाणात वाढकेडीएमसीने कल्याण-डोंबिवलीत घरोघरी ताप सर्वेक्षण तसेच कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे.सध्या प्रतिदिन ४०० ते ४५० चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याचीही संशयित रुग्णांची तक्रार आहे.खाजगी लॅबमध्ये करणाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने अहवालास विलंब होत आहे.कोरोनाची चाचणी दिल्यानंतर अहवाल मिळेपर्यंत त्यांनी घरातच क्वारंटाइन होणे महत्त्वाचे आहे.अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. नागरिकांनी नियमही पाळावे.>‘ते’ काम अंतिम टप्प्यात : रुग्णालयांत खाटांअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधींकडून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात २०० बेड उभारणीचे काम सुरू केले आहे. ते काम ९५ टक्के पूर्ण झाले. लवकरच तेथे रुग्णांवर उपचार सुरू होतील. दरम्यान, कल्याणमधील फडके मैदानातही ५५० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, अद्याप तेथे कोणतेही काम सुरू झालेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस