शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
2
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
3
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
4
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
5
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
6
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
7
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
8
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
9
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
10
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
12
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
13
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
14
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
15
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
16
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
17
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
18
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
19
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
20
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...

CoronaVirus: दहा दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:58 IST

एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा ९ ते १० दिवसांचा आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. मागील १५ दिवसांत २,६६० रुग्ण सापडले असून, ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीतच हे चित्र पाहता पुणे, मुंबई, ठाणे यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.लॉकडाऊन असेपर्यंत केडीएमसी हद्दीत रुग्णांचे प्रमाण मर्यादित होते. मात्र, ८ जूनला अनलॉक झाल्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे शहरात आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी १० वरून ३० दिवसांवर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के असले तरी, रुग्ण दुपटीचा कालावाधी ९ ते १० दिवसांचा आहे.केडीएमसी हद्दीत ९ जूनपर्यंत १,५६२ रुग्ण होते. तर, यातील ४६ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, मागील १५ दिवसांत रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. २,६६० रुग्णांमधील ७० ते ८० टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तरुणांचा वयोगट ३० ते ४५ वर्षांदरम्यानचा आहे. तर, उर्वरित रुग्णांमध्ये ६२ ते ९२ वयोगटांतील व्यक्ती असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस, किडनीचे आजार आहेत.दरम्यान, बुधवारपर्यंत कल्याण पश्चिमेत सर्वाधिक १,३१७, पूर्वेत १,०५८, डोंबिवली पूर्वेत ९१५, पश्चिमेत ५८७, मांडा-टिटवाळा-मोहने ३०७, तर, पिसवली भागात आठ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्या ४,१९२ पर्यंत पोहोचली असून, यातील ८५ जणांचा बळी गेला आहे. तर, १,६८८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, सध्या २,४१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात दररोज ५० ते ७० पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, अनलॉक झाल्यानंतर प्रतिदिन किमान ७२ ते कमाल २५६ पर्यंत रुग्ण सापडले आहेत.अनलॉक १ मध्ये नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. सुरुवातीला केडीएमसी हद्दीतून मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणाऱ्यांकडून कोरोना संक्रमित होत असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले होते. परंतु, आता शहरातील सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन केले पाहिजे. आपण प्रत्येक जण आता कोरोना योद्धा आहोत, ही भावना आत्मसात करून खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.>कोरोना चाचणीच्या प्रमाणात वाढकेडीएमसीने कल्याण-डोंबिवलीत घरोघरी ताप सर्वेक्षण तसेच कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे.सध्या प्रतिदिन ४०० ते ४५० चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याचीही संशयित रुग्णांची तक्रार आहे.खाजगी लॅबमध्ये करणाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने अहवालास विलंब होत आहे.कोरोनाची चाचणी दिल्यानंतर अहवाल मिळेपर्यंत त्यांनी घरातच क्वारंटाइन होणे महत्त्वाचे आहे.अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. नागरिकांनी नियमही पाळावे.>‘ते’ काम अंतिम टप्प्यात : रुग्णालयांत खाटांअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधींकडून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात २०० बेड उभारणीचे काम सुरू केले आहे. ते काम ९५ टक्के पूर्ण झाले. लवकरच तेथे रुग्णांवर उपचार सुरू होतील. दरम्यान, कल्याणमधील फडके मैदानातही ५५० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, अद्याप तेथे कोणतेही काम सुरू झालेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस