शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Coronavirus : ठाण्यात कोरोनाच्या महामारीमध्ये वयोवृद्धांचे झाले सर्वाधिक मृत्यू, सत्तरीतील ज्येष्ठांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 08:54 IST

मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे.

- अजित मांडकेठाणे - मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे. याखालोखाल ६० ते ७० वयोगटातील ३४० जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक दिसला आहे. आजही हा धोका कायम असल्याने ज्येष्ठांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत सात लाख आठ हजार ६०० कोरोना चाचण्या झाल्या असून त्यात ५२ हजार ९४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून ५० हजार २९४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार ४४७ एवढी आहे. तर एक हजार १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये कोरोनाची लाट आल्यापासून आतापर्यंत झालेल्या या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हे वयोवृद्धांचे झाले आहेत. परंतु, काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आजही काही कामानिमित्त किंवा घरात बसायला कंटाळा आला म्हणून बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. एप्रिलमध्ये १७ तर मे मध्ये १६०, जूनमध्ये ३११, जुलैमध्ये २५५ जणांचे मृत्यू झाले होते. तर नोव्हेंबर महिन्यात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्युदर हा २.२८ टक्के एवढा आहे. दरम्यान, मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिका विविध उपाय करीत आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरात माेठ्या संख्येने काेराेनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनापुढे यावर ताेडगा कसा काढायचा असा प्रश्न उभा हाेता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे