शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 04:23 IST

नव्या १५६६ रुग्णांची वाढ; आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने ७५ जणांचा मृत्यू झाला. तर, एक हजार ५६६ नव्या रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९६ हजार ९६० झाली असून मृतांचा आकडा दोन हजार ७१८ झाला.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण नव्याने आढळल्याने बाधितांची संख्या २१ हजार ८०२ वर पोहोचली आहे. चार जणांच्या मृत्यूने आतापर्यंत मृतांची संख्या ६९२ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३०९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत २२ हजार १५५ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ४३१ झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात १९ बाधित आढळून आले. तर, तब्बल ४० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत येथे बाधितांची संख्या तीन हजार ७५६ झाली असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९९ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी करण्यात आली. अंबरनाथमध्ये ६३ नवे रुग्ण वाढले असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार १८२ तर, मृतांची १६५ आहे. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १३ झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १२१ रुग्णांची वाढ तर चार मृत्यू झाले आहेत.वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात शनिवारी २१६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, मात्र त्याच वेळी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २८७ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवर पालिका हद्दीतील १० हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात सात रुग्णांनी आपले प्राण गमावले. यात वसई-१, विरार-२ आणि नालासोपारामधील४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात आढळलेल्या २१६ रुग्णांमध्ये वसई-७३, वसई-विरार-४, नायगाव-४, नालासोपारा-७० आणि विरार-६५ रुग्णांचा समावेश आहे.नवी मुंबईमध्ये ४५५ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४५५ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १८,१४९ झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने चाचण्याची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत ३६,४४३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून ३२,२२८ अँटिजेन चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल १४,०७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ४६१ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या