शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 04:23 IST

नव्या १५६६ रुग्णांची वाढ; आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने ७५ जणांचा मृत्यू झाला. तर, एक हजार ५६६ नव्या रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९६ हजार ९६० झाली असून मृतांचा आकडा दोन हजार ७१८ झाला.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण नव्याने आढळल्याने बाधितांची संख्या २१ हजार ८०२ वर पोहोचली आहे. चार जणांच्या मृत्यूने आतापर्यंत मृतांची संख्या ६९२ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३०९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत २२ हजार १५५ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ४३१ झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात १९ बाधित आढळून आले. तर, तब्बल ४० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत येथे बाधितांची संख्या तीन हजार ७५६ झाली असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९९ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी करण्यात आली. अंबरनाथमध्ये ६३ नवे रुग्ण वाढले असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार १८२ तर, मृतांची १६५ आहे. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १३ झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १२१ रुग्णांची वाढ तर चार मृत्यू झाले आहेत.वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात शनिवारी २१६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, मात्र त्याच वेळी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २८७ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवर पालिका हद्दीतील १० हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात सात रुग्णांनी आपले प्राण गमावले. यात वसई-१, विरार-२ आणि नालासोपारामधील४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात आढळलेल्या २१६ रुग्णांमध्ये वसई-७३, वसई-विरार-४, नायगाव-४, नालासोपारा-७० आणि विरार-६५ रुग्णांचा समावेश आहे.नवी मुंबईमध्ये ४५५ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४५५ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १८,१४९ झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने चाचण्याची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत ३६,४४३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून ३२,२२८ अँटिजेन चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल १४,०७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ४६१ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या