शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने झाले सुरू, कच्च्या मालाची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 03:16 IST

डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत.

- मुरलीधर भवारडोंबिवली : तब्बल ४४ दिवसांच्या लॉकडाउननंतर डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरू झाले आहेत. मात्र या कारखान्यांना कच्चा माल मिळत नसल्याने कारखाने सुरू होऊनही उत्पादनाला हवी तशी गती मिळालेली नाही. त्यात कंत्राटी परप्रांतीय कामगार गावी गेल्याने डोंबिवलीतील कारखानदारांना उत्पादन सुरु करताना अडथळे येत आहेत.डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत. लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच प्रदूषण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला होता. या कारवाईच्या निषेधार्थ लॉकडाउन होण्यापूर्वीच सर्व कारखानदारांनी उत्पादन बंद आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरानामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्चला देशात लॉकडाउन लागू झाला. ४४ दिवसानंतर काही अटी शर्तीच्या आधारे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ४२० कारखान्यांपैकी केवळ ६० कारखाने सुरु झाले. परंतु कारखानदारांना कच्चा माल नियमित मिळत नाही. त्यामुळे कारखाना सुरु होऊनही उत्पादन घेता येत नाही.टेक्सटाइल कारखान्यांमध्ये बहुतांश कंत्राटी कामगार असून त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात रोजगार नसल्याने उपासमारीला कंटाळून परप्रांतीय कामगार गावी निघून गेले. त्यामुळे टेक्सटाइल कारखान्यांमध्ये कामगारांची वानवा आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत जोशी यांनी दिली.कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने कारखानदारांवर सर्व जबाबदारी टाकली आहे. लघु उद्योगजकांना सरकारने काही पॅकेज जाहीर केले तरच ते तग धरू शकतील.सरकारने उद्योजकांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अन्य उद्योजक उद्योग सुरू करणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी त्यांचे काम सुरु केलेले नाही. लॉकडाउनमुळे नाशिक व पुण्याहून येणारा कच्चा माल येत नाही. त्यात लोडिंग कामगार हे परगावी गेल्याने पंचाईत झाली आहे. कारखानदार टप्प्याटप्प्याने कारखाने सुरू करणार आहे. सध्या ६० कारखाने सुरू झाले आहेत. बाजारात खेळत्या भांडवलाची टंचाई आहे. त्यामुळे पगार कसा करायचा, कच्चा माल कधी उपलब्ध होणार, उत्पादन तयार केल्यास त्याला उठाव मिळणार की नाही, या विवंचनेत कारखानदार आहेत.- देवेन सोनी, अध्यक्ष, कामा संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाMIDCएमआयडीसी