शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

coronavirus: डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने झाले सुरू, कच्च्या मालाची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 03:16 IST

डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत.

- मुरलीधर भवारडोंबिवली : तब्बल ४४ दिवसांच्या लॉकडाउननंतर डोंबिवली एमआयडीसीतील ६० कारखाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून सुरू झाले आहेत. मात्र या कारखान्यांना कच्चा माल मिळत नसल्याने कारखाने सुरू होऊनही उत्पादनाला हवी तशी गती मिळालेली नाही. त्यात कंत्राटी परप्रांतीय कामगार गावी गेल्याने डोंबिवलीतील कारखानदारांना उत्पादन सुरु करताना अडथळे येत आहेत.डोंबिवलीत औषध, रासायनिक, इंजिनिअरिंग आणि टेक्सटाइल या प्रकारातील जवळपास ४२० कारखाने आहेत. लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच प्रदूषण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला होता. या कारवाईच्या निषेधार्थ लॉकडाउन होण्यापूर्वीच सर्व कारखानदारांनी उत्पादन बंद आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरानामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर २४ मार्चला देशात लॉकडाउन लागू झाला. ४४ दिवसानंतर काही अटी शर्तीच्या आधारे कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ४२० कारखान्यांपैकी केवळ ६० कारखाने सुरु झाले. परंतु कारखानदारांना कच्चा माल नियमित मिळत नाही. त्यामुळे कारखाना सुरु होऊनही उत्पादन घेता येत नाही.टेक्सटाइल कारखान्यांमध्ये बहुतांश कंत्राटी कामगार असून त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात रोजगार नसल्याने उपासमारीला कंटाळून परप्रांतीय कामगार गावी निघून गेले. त्यामुळे टेक्सटाइल कारखान्यांमध्ये कामगारांची वानवा आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत जोशी यांनी दिली.कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने कारखानदारांवर सर्व जबाबदारी टाकली आहे. लघु उद्योगजकांना सरकारने काही पॅकेज जाहीर केले तरच ते तग धरू शकतील.सरकारने उद्योजकांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अन्य उद्योजक उद्योग सुरू करणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी त्यांचे काम सुरु केलेले नाही. लॉकडाउनमुळे नाशिक व पुण्याहून येणारा कच्चा माल येत नाही. त्यात लोडिंग कामगार हे परगावी गेल्याने पंचाईत झाली आहे. कारखानदार टप्प्याटप्प्याने कारखाने सुरू करणार आहे. सध्या ६० कारखाने सुरू झाले आहेत. बाजारात खेळत्या भांडवलाची टंचाई आहे. त्यामुळे पगार कसा करायचा, कच्चा माल कधी उपलब्ध होणार, उत्पादन तयार केल्यास त्याला उठाव मिळणार की नाही, या विवंचनेत कारखानदार आहेत.- देवेन सोनी, अध्यक्ष, कामा संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाMIDCएमआयडीसी