शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

coronavirus: ठाणे जिल्ह्यात २५ हजार ६५४ रुग्ण ठणठणीत, योद्ध्यांची मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:47 IST

बुधवारपर्यंत जिल्ह्यात २५ हजार ६५४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात सहा महिन्यांच्या लहान बाळापासून १०४ वर्षांपर्यंतच्या वृद्धानेही कोरोनावर मात केलेली आहे.

- नारायण जाधवठाणे : ठाणे जिल्ह्याने अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या बाबतीत मुंबईला मागे टाकले असले, तरी रुग्ण बरे होण्याच्या रुग्णसंख्येतही मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि विस्तीर्ण ग्रामीण पट्टा असलेल्या या जिल्ह्यात ८ जुलै अर्थात बुधवारी संध्याकाळपर्यंत बरे झालेल्या रुग्णांनी २५ हजारांचा पल्ला गाठला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात २५ हजार ६५४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात सहा महिन्यांच्या लहान बाळापासून १०४ वर्षांपर्यंतच्या वृद्धानेही कोरोनावर मात केलेली आहे.प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ९८६ चाचण्या केल्या असून त्यात ९५ हजार ४७३ रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४७ हजार ६३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी २० हजार पाच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर विविध शहरांत उपचार सुरू असून २५ हजार ६५४ कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिकांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांसह ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्च महिन्यापासून राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळेच हा २५ हजारांचा पल्ला गाठता आला आहे. बरे होण्याची ही आकडेवारी ५३ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्रीपर्यंत १४०४ मृत्यू झाले आहेत.बरे झालेले रुग्ण जास्तठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ या शहरांत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, जि.प. सदस्य, अनेक नगरसेवकांसह पत्रकार, विविध कर्मचारी, पोलिसांसह बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एसटी कर्मचाऱ्यांनाही ड्युटी करताना कोरोनाची लागण झाली आहे. यात बहुसंख्य जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे