शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: २४ हजार कामगारांना घरी जाण्याची ओढ; जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:17 IST

२,३१५ मजूर रेल्वेने रवाना, गावी जाण्यासाठी सर्वांच्या विनवण्या

सुरेश लोखंडे  

ठाणे : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात १६३ निवारा केंद्र सुरू असून त्यात २४ हजार २९२ मजूर, कामगार, दिव्यांग नागरिक, निराधार व्यक्तींना आश्रय दिलेला आहे. आता सरकारच्या नव्या आदेशामुळे तब्बल एक ते दीड महिन्यांपासून वास्तव्याला असलेल्या या लोकांना घरी जाण्याची ओढ लागली आहे.

सरकारच्या आदेशानुसार भिवंडी शहर व पसिरातील दोन हजार ३१५ कामगार, मजूर रेल्वेने त्यांच्या युपी, बिहारमधील गावी गेले आहेत. त्यांच्यासाठी खास रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय त्या आणखी सोडाव्यात, पर्यायी व्यवस्था करावी किंंवा जाण्याची परवानगी देण्याची मागणी निवारा केंद्रातील प्रवासी, कामगार, मजुरांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांची ठिकठिकाणच्या निवारा केंद्रात भोजन व निवास व्यवस्था केलेली आहे. सेवाभावी संस्थांकडूनदेखील ठिकठिकाणी भोजन, निवास व्यवस्था केली जात आहे. जिल्हा परिषदेने व मुरबाड नगरपंचायतीने पाच ठिकाणी निवारा केंद्रात १४६ जणांची सोय केली आहे. तर शहापूरमध्ये दोन ठिकाणी ७८ जणांची सोय केली आहे.

कसारा येथेही दोन क्वारंटाइन सेंटर असून आहेत. शिरोळ आश्रमशाळेत ४६ जण व खर्डी ते कसारा घाटापर्यंत पायी जाणाऱ्या प्रवाशांना ४५ दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापन हॉट्सअ‍ॅप ग्रुप दररोज एक हजार लोकांना जेवण देत आहे. या व्यक्ती गोंदिया, चंद्रपूरसह राज्यातील त्यांच्या गावी जाण्यासाठी रोज विनंती करीत आहेत.कल्याणच्या ग्रामीण भागात बदलापूरच्या बीएसयूपीच्या इमारतीत २० बेडचा क्वारंटाइन कक्ष आहे. तेथे १५ जण होते. भिवंडी बायपासच्या टाटा आमंत्रामध्ये ६५ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले होते.या संचारबंदीत म्हारळगांव, वरप, कांबा परिसरात 1600 मजुरांना ग्रामपंचायतींनी अन्नधान्य वाटप केले. या मजुरांना गावी जाण्यासाठी म्हारळ येथे मंगळवारी  355 तर कांब्याला ४२७ आणि वरपला मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने जिल्ह्यातील या निवारा केंद्रांना फूड पाकीट पुरवठा व भोजन व्यवस्था सुरू आहे. याशिवाय शासनाची शिवभोजन थाळी या अडकलेल्या व्यक्तींना पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यातील या सर्व निवारा केंद्रांवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून संबंधितांकडून दैनंदिन आढावा घेत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस