शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले १८७६ नवे रुग्ण; ४७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 06:18 IST

शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ६१८ तर मृतांची एक हजार २५२ झाली आहे.शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८६ तर मृतांची १४० इतकी झाली. ठाणे महापालिका हद्दीत ३७३ बाधितांसह १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ७३१ तर मृतांची ४०२ वर गेली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ३०३ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार ३१४ तर मृतांची संख्या १६२ इतकी झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात ६९ बाधीतांसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ३१९ वर तर मृतांची संख्या १२0 वर पोहोचली. उल्हासनगर २५१ रु ग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८१० तर मृतांची ५३ झाली आहे.नवी मुंबईत मृतांचा आकडा अडीचशेच्या घरातनवी मुंबई: शहरात कोरोना रूग्णांच्या वाढीचा आलेख खाली येताना दिसत नाही. विशेषत: मृतांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेसमोर मृतांचा दर कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत ७,७९३ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी ४,४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ३,११६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी १९१ नवीन रूग्णांची भर पडली आहे. तर १६७ रूग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. कोपरखैरणे विभागातून सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यापाठोपाठ नेरूळ विभागात बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३१ इतकी आहे.वसई-विरारमध्ये सहा हजारांचा टप्पा पारवसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभरात २११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने सहा हजारांचा टप्पा पार झाला असून एकूण रुग्णांची संख्या ६१७० झाली आहे. दरम्यान, १४२ जणांनी या जीवघेण्या आजारावर दिवसभरात मात केली आहे.वसई-विरारमध्ये रविवारी आढळलेल्या २११ रुग्णांमुळे सहा हजारचा टप्पा पार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र त्याच वेळी दिवसभरात १४२ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २८१० झाली आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ठरली.रायगडमध्ये दिवसभरात २६२ कोरोनाबाधितअलिबाग : जिल्ह्यात रविवारी ५ जुलै रोजी २६२ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ५१८१ वर पोहोचली आहे. त्यापैकी २९०५ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १४५, पनवेल ग्रामीणमध्ये ३९, उरण २३, अलिबाग ६, कूूर्जत ६, पेण ९, महाड २, खालापूर १०, माणगाव ४, रोहा १०, श्रीवर्धन ७, सुधागड १ असे एकूण २६२ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. दिवसभरात पनवेल मनपा ४८, पनवेल ग्रामीण ३९, खालापूर ३, कर्जत १६, पेण १३, अलिबाग १०, माणगाव २ असे १३१ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे