शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख चढा; शुक्रवारी १७४७ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 02:49 IST

CoronaVirus Thane News: दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू

ठाणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी तब्बल एक हजार ७४७ ने वाढ झाली असून आतापर्यंत एक लाख ८९ हजार ६१ व्यक्तींना लागण झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या चार हजार ७७७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे शहरात ४०० नवे रुग्ण आढळले. परिणामी, शहरात आतापर्यंत ४० हजार ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसभरात ठाण्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत शुक्रवारी ३६७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचे मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरात ४१ नवे रुग्ण आढळले असून, एकाचा आज मृत्यू झाला. भिवंडीला ४३ नवे रुग्ण आढळून आले. भिवंडीतील एकूण रुग्णसंख्या पाच हजार ३६० असून मृतांची संख्या ३२२ आहे. मीरा-भार्इंदरमध्ये नव्या १९५ रुग्णांची तर, सात मृत्यंूची नोंद झाली. अंबरनाथमध्ये ४४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ५२ नवे रुग्ण सापडल्यामुळे आता बाधित सहा हजार ६२६ आहेत.वसई-विरारमध्ये आठ रुग्णांचा मृत्यूवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शुक्रवारी दिवसभरात १६४ नवे रुग्ण आढळून आले असून चिंताजनक म्हणजे दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात एकट्या वसईत सहा आणि नालासोपारात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.रायगडमध्ये ३२९ नवे रु ग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी दिवसभरात ३२९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४९ हजार ९६६ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.नवी मुंबईत ८९ टक्के रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४३३ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३५,४१३ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. शुक्रवारी ३५६ नवीन रुग्ण वाढले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या