शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रविवारी सापडले कोरोनाचे १,४२७ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 07:43 IST

ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे एक हजार ४२७ रु ग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ९६५ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे एक हजार ४२७ रु ग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ९६५ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या तीन हजार ५१९ झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून पुढे आली आहे.ठाणे मनपा हद्दीत २०८ नवे रु ग्ण सापडले आहेत. त्यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण २५ हजार ७२१ रु ग्ण झाले आहेत. रविवारी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ८३४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपात रविवारी ३६३ रु ग्ण नव्याने आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरांतील मृतांची आजवरची संख्या ६२० झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २८ हजार ६३७ पर्यंत नोंदवली गेली आहे.उल्हासनगरला ३४ नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या सात हजार ७५७ वर पोहोचली आहे, तर आज एकाचा मृत्यू झाल्यामुळे २२५ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.भिवंडी मनपा हद्दीत १२ रु ग्ण नव्याने सापडले आहेत. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेली नाही. येथे आजपर्यंत चार हजार १८० बाधितांची, तर २८३ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेमध्ये १२५ रुग्णांची भर पडली, तर एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण बाधितांची संख्या १२ हजार ४५६, तर ४२० मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.अंबरनाथ शहरात ४० रु ग्ण नव्याने आढळून आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत चार हजार ९३९ बाधित, तर १८५ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये ३२ रु ग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण चार हजार ७७ झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृतांची संख्या ७१ कायम आहे.ग्रामीण भागात १३७ रुग्णांची वाढठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागांत १३७ रु ग्णांची वाढ झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावपाड्यांत आतापर्यंत नऊ हजार ३३८ बाधित रुग्ण झाले असून, ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.नवी मुंबईत ४७६ नवीन रुग्णांची भरमागील २४ तासांत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५,८६0 इतकी झाली आहे. यापैकी २१,७१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३५६२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.नवी मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्के इतके आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ५८१ इतकी आहे. मागील २४ तासांत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नेरूळ विभागातून सर्वाधिक म्हणजेच ८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे बेलापूर विभागातून ४६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तुर्भे ५0, कोपरखैरणे ७४, घणसोली ४९ आणि ऐरोली विभागातून तब्बल १२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.वसई-विरारमध्ये १२४ रुग्ण कोरोनामुक्तवसई-विरार शहरात रविवारी दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १३५ नवे रुग्ण आढळून आले असून १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेने दिली.महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १६ हजार ६०७ वर पोहोचली आहे. तर शहरात आतापर्यंत एकूण मुक्त रुग्णांची संख्या १४ हजार ३७४ इतकी झाली आहे. महापालिका हद्दीतील मृतांची संख्या ३५५ वर पोहोचली असून शहरात विविध रुग्णालयांत आता केवळ १ हजार ८७८ रुग्ण उपचार घेत आहेत.रायगडमध्ये ५१४ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात रविवारी ३० आॅगस्ट रोजी ५१४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २२ हजार ७०७ वर पोहोचली आहे. त्यापैकी २२ हजार ८४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रविवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २१८, पनवेल ग्रामीणमध्ये ६०, उरण २०, खालापूर २०, कर्जत १९, पेण २७, अलिबाग ४३, मुरूड ७, माणगाव ३८, रोहा २०, सुधागड ११, श्रीवर्धन १, महाड २६, पोलादपूर ४ असे एकूण ५१४ रुग्ण सापडले आहेत.दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२६, पनवेल ग्रामीण ६२, उरण १, खालापूर ६, कर्जत ३, पेण ५, अलिबाग ३४, माणगाव १५, रोहा २६, सुधागड ३, श्रीवर्धन २, म्हसळा ७, महाड २३, पोलादपूर ८ असे एकूण ३२१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला.आतापर्यंत बाधितांपैकी २२ हजार ८४५ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ८०० रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ३४९२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे