शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'कोरोनामुळे दिवाळे निघाले, आम्हाला हवी नुकसानभरपाई", जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:21 IST

एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे. 

- अजित मांडकेठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बुडाले. कित्येकांना नुकसान सहन करावे लागले. आता कोरोना असला तरी सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे आम्हाला मागील दोन वर्षात झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी ठाणे  जिल्ह्यातील अनेक दुकानदार, व्यापारी व संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. एवढेच नव्हे, नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला न्यायालयात खेचू, असे इशारेही या मागणीपत्रात देण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्रांची फाईल ही जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय झाली आहे. शिवाय, या पत्र घोळातून मार्ग कसा काढायचा, या पेचात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सापडले आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आली. यावेळी कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जवळजवळ सहा महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. त्याचा फटका अनेकांना बसला. नोकऱ्या गेल्या, संसार उद्ध्वस्त झाले. काहींचे नव्याने सुरू केलेले उद्योगही कोलमडले.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत कोरोनाची दाहकता कमी झाल्याचे लक्षात आल्याने सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत. दरम्यान, सरकारने कोरोनामुळे जीव गमावलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. विधवा, लहान मुले असलेल्यांच्या परिवारांसाठीही मदत देऊ केली. असाच मदतीचा सरकारकडून मिळावा, या हेतूने गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रे येऊ लागली आहेत. कोरोनाच्या काळात तुम्ही केलेल्या लॉकडाऊनमुळे माझ्या व्यवसायाला फटका बसला. दोन वर्षात माझे नऊ लाखांचे  नुकसान झाले आहे. ते भरून निघावे आणि त्यावर १८ टक्के व्याज मिळावे, अशा आशयाची पत्रे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेचा विषय ठरली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही पत्रे स्वीकारली आणि ती पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवू. त्यांच्याकडून उत्तर आल्यावर तुम्हाला कळवू, अशा उत्तरांनी तुर्तास  तक्रारदार पत्रकर्त्यांची समजूत काढली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे