शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Corona Virus: उपनगरीय रेल्वे प्रवासी म्हणतात, कोरोना से क्या डरना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:10 IST

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी शहरी भागांतील प्रवासी हे लोकल प्रवासात कोणी शिंकले, तर त्याला रुमाल धरण्याचा, डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.

अनिकेत घमंडी 

डोंबिवली : सर्वत्र कोरोना व्हायरसची चर्चा आणि भीतीचे वातावरण असताना, उपनगरीय रेल्वे प्रवासी मात्र तुलनेने बिनधास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना से क्या डरना, अशाच काहीशा भूमिकेत प्रवासी आहेत. ज्या प्रवाशांना सर्दीचा त्रास आहे, ते स्वत:हून रुमाल बांधून प्रवास करताना दिसले.

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी शहरी भागांतील प्रवासी हे लोकल प्रवासात कोणी शिंकले, तर त्याला रुमाल धरण्याचा, डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. त्या तुलनेने कर्जत, कसारा, आसनगाव, खडवली आदी ग्रामीण भागांतील प्रवासी रुमाल बांधून प्रवास करत आहेत. प्रवाशांच्या मते जोपर्यंत नोकरीला जावे लागणार आहे, तोपर्यंत प्रवाशांना गर्दीचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही. काही प्रमाणात आयटी सेक्टर वगळता सर्वत्र कामावर येण्याची सक्ती आहेच. त्यामुळे राज्य शासनाने ही गर्दी कमी करण्यासाठी विचार करणे जास्त गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे सांगणे कितपत सयुक्तिक आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांमध्ये या आजाराबाबत जास्त धास्ती आहे. पुणे येथून येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासी रुमाल बांधून प्रवास करत होते. नेहमीच्या तुलनेने प्रगती एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी कमी होती. - प्रभाकर गंगावणे, कर्जतलोकलचा प्रवासी सतर्क आहे, पण घाबरलेला नाही. गर्दी टाळणे शक्यच नाही, या मानसिकतेतून तो प्रवास करत आहे. त्यातही एखाद्याला सर्दी, खोकला असेल तर, सहप्रवासीच रुमाल बांधण्याचा सल्ला देत आहेत. - मंदार अभ्यंकर, डोंबिवलीमहिला प्रवासी प्रवासादरम्यान जनजागृती करीत आहेत. सहप्रवाशांना बरं वाटत नसेल तर वैद्यांचा सल्ला घेण्याचे ते सांगत आहेत. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याची माहितीही त्या देत आहेत. महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला सदस्यांनी लोकल डब्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली. रेल्वे प्रशासनास स्थानकातील स्वच्छतेस प्राधान्य देण्यास सांगितले आहे.- वंदना सोनावणे, सदस्य, झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीकोरोनामुळे लोकलची गर्दी कमी झालेली नाही. तसेही इथल्या नागरिकांना सर्दी, खोकला असे त्रास सुरूच असतात. त्यामुळे कोरोना व्हायरसने फार काही तणाव, भीती असं काही झालेले नाही. - हर्षा चव्हाण, कल्याणया आजाराविषयी खूप संभ्रम दिसून येत आहे. निश्चित कारण, निदान, चिकित्सा यांच्या माहितीचा अभाव आहे. याबाबत चर्चा करून अवास्तव भीती पसरवली जात आहे. स्वच्छता, जनजागृती ही त्यासाठी प्रभावी माध्यमे आहेत. - गंधार कुलकर्णी 

टॅग्स :corona virusकोरोनाrailwayरेल्वे