शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Corona Virus: कामानिमित्त परदेशात गेलेले ९८ नागरिक कोकणात परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 01:36 IST

चीनमधून आले २४ जण : सर्व प्रवासी निगराणीखाली

ठाणे : परदेशात काही कामांनिमित्त किंवा पर्यटनाला कुटुंबासह गेलेल्यांपैकी ९८ जण भारतात परतले आहेत. सर्व जण कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील रहिवासी असून, त्यांच्यापैकी २४ जण चीनमधून आल्याची माहिती पुढे आली आहे.या ९८ पैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, हे सर्व आता निगराणीखाली असून स्थिर आहेत. विशेष म्हणजे, त्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पालघरसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात परदेशातून परतले आहेत. यात १४ दिवसांची निगराणी पूर्ण करणारे २८ जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो नागरिकांचा जीव गेल्यामुळे जगभरात हाय अ‍ॅलर्ट जाहीर केला आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने, तो होऊ नये याची खबरदारी घेणे हाच पर्याय उरला आहे. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मास्कचा तुटवडा सर्वत्र निर्माण झाला आहे. दुसरीकडे परदेशात गेलेले भारतीय नागरिक भारतात परतत मायदेशी परतत आहेत.

कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत १० मार्चपर्यंत एकूण ९८ नागरिक परदेशवारी करून परतले आहेत. कोरोना विषाणूबाबतची विशेष खबरदारी म्हणून या प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, दक्षता म्हणून त्यांना १४ दिवसांच्या निगराणीसाठी ठेवले आहे. त्यातून २८ जण त्या दिवसांच्या निगराणीतून बाहेर पडले आहेत, तसेच उर्वरित ७० जण हे स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकानिहाय कक्ष तयारजिल्हा प्रशासनाने खबरदारी घेऊन ठाणे जिल्ह्यातील महापालिकानिहाय कक्ष तयार करून बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. त्यानुसार, ठाणे सिव्हिलमध्ये सात बेड्स आणि एक व्हेंटिलेटर ठेवले आहे. तसेच ठामपाच्या कळवा आणि नवी मुंबईच्या वाशी रुग्णालयात प्रत्येकी आठ बेड्स आणि एक व्हेंटिलेटर, भिवंडीतील इंदिरा गांधी येथे सहा आणि खासगी रुग्णालयात २० बेड्स, उल्हासनगर येथे सहा, पंडित भीमसेन जोशी मीरा-भाईंदरमध्ये दहा, मालाड-मालवणी येथे सहा, तसेच क ल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात दहा बेड्स उपलब्ध ठेवल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.या देशातून आले प्रवासीठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांत एकूण ९८ नागरिक परदेशातून आले आहेत. त्यामध्ये चीनमधून-२४, इराण-३०, इंडोनेशिया आणि सिंगापूर ३६ तसेच इटली, थायलंड येथून आलेल्या आठ नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस