शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Corona Virus: कामानिमित्त परदेशात गेलेले ९८ नागरिक कोकणात परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 01:36 IST

चीनमधून आले २४ जण : सर्व प्रवासी निगराणीखाली

ठाणे : परदेशात काही कामांनिमित्त किंवा पर्यटनाला कुटुंबासह गेलेल्यांपैकी ९८ जण भारतात परतले आहेत. सर्व जण कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील रहिवासी असून, त्यांच्यापैकी २४ जण चीनमधून आल्याची माहिती पुढे आली आहे.या ९८ पैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, हे सर्व आता निगराणीखाली असून स्थिर आहेत. विशेष म्हणजे, त्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पालघरसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात परदेशातून परतले आहेत. यात १४ दिवसांची निगराणी पूर्ण करणारे २८ जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो नागरिकांचा जीव गेल्यामुळे जगभरात हाय अ‍ॅलर्ट जाहीर केला आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने, तो होऊ नये याची खबरदारी घेणे हाच पर्याय उरला आहे. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मास्कचा तुटवडा सर्वत्र निर्माण झाला आहे. दुसरीकडे परदेशात गेलेले भारतीय नागरिक भारतात परतत मायदेशी परतत आहेत.

कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत १० मार्चपर्यंत एकूण ९८ नागरिक परदेशवारी करून परतले आहेत. कोरोना विषाणूबाबतची विशेष खबरदारी म्हणून या प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, दक्षता म्हणून त्यांना १४ दिवसांच्या निगराणीसाठी ठेवले आहे. त्यातून २८ जण त्या दिवसांच्या निगराणीतून बाहेर पडले आहेत, तसेच उर्वरित ७० जण हे स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकानिहाय कक्ष तयारजिल्हा प्रशासनाने खबरदारी घेऊन ठाणे जिल्ह्यातील महापालिकानिहाय कक्ष तयार करून बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. त्यानुसार, ठाणे सिव्हिलमध्ये सात बेड्स आणि एक व्हेंटिलेटर ठेवले आहे. तसेच ठामपाच्या कळवा आणि नवी मुंबईच्या वाशी रुग्णालयात प्रत्येकी आठ बेड्स आणि एक व्हेंटिलेटर, भिवंडीतील इंदिरा गांधी येथे सहा आणि खासगी रुग्णालयात २० बेड्स, उल्हासनगर येथे सहा, पंडित भीमसेन जोशी मीरा-भाईंदरमध्ये दहा, मालाड-मालवणी येथे सहा, तसेच क ल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात दहा बेड्स उपलब्ध ठेवल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.या देशातून आले प्रवासीठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांत एकूण ९८ नागरिक परदेशातून आले आहेत. त्यामध्ये चीनमधून-२४, इराण-३०, इंडोनेशिया आणि सिंगापूर ३६ तसेच इटली, थायलंड येथून आलेल्या आठ नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस