शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाणे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या शंभरी पार ; ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:43 IST

जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात नव्या १४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ही १०५ वर गेली आहे. तर यामध्ये आतापर्यत ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रु ग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत आहे. त्यात जिल्ह्यात १४ नव्या कोरोनाग्रस्त रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भार्इंदरमध्ये चार अशा १४ नव्या कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १०५ वर पोहोचला आहे. तर, कोरोनाने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप भिवंडीत एकही रु ग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने दिली.        ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे याच आजाराने मृत्यू होणार्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यात २४ तासात १४ नव्या कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहरात चार, कल्याणमध्ये सहा आणि मीरा भार्इंदरमध्ये चार रु ग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रु ग्णांची संख्या १०५ इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यात ६ रु ग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालीची देखील नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबईत दोन, ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. तर उल्हानगर महापालिका क्षेत्रात एक आणि ठाणे ग्रामीणमध्ये तीन करोनाबाधित रु ग्ण आहेत. दरम्यान, भिवंडी तालुक्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रु ग्ण आढळून न आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या