शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कोरोना संकटकाळात 170 कुटुंबे झाली बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 01:13 IST

कशेळी येथील अनधिकृत बांधकामावर एमएमआरडीएची कारवाई : नऊ निवासी इमारतींवर हातोडा

नितीन पंडित 

भिवंडी : कशेळी येथील पद्मावती इस्टेटमध्ये असलेल्या नऊ अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी करण्यात आली. विकासक व जागामालक यांच्यातील वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कोरोना काळात झालेल्या या कारवाईमुळे सुमारे १७० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, या कारवाईसाठी नारपोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

विकासक रसिक शाह यांनी कशेळी ग्रामपंचायत हद्दीत पद्मावती इस्टेट नावाचे निवासी संकुल परवानगी न घेता बांधले. जमीन मालक सुनीता मदरानी व इतरांनी विकासकाविरोधात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त राजीव हे २९ एप्रिल रोजी हजर झाले. त्यावेळी अनधिकृत इमारती कशा बांधल्या जाऊ शकतात? यावर एमएमआरडीएने कोणती कारवाई केली किंवा कोणती कारवाई प्रस्तावित आहे? बांधकाम होत असताना डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा प्रस्तावित आहे? भविष्यात असे अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी एमएमआरडीए काय पावले उचलणार आहेत? आदी प्रश्न उपस्थित करुन एमआरडीएने  ६ मे रोजी उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर एमएमआरडीएने  अनधिकृत बांधकाम ६ मेच्या आत तोडण्यात येईल, असे निवेदन न्यायालयासमोर दिले होते.

एमएमआरडीएने कोणतीही सूचना न देता सोमवारी सकाळी थेट इमारती तोडण्याची कारवाई केल्याचा आरोप करुन पद्मावती इस्टेटमधील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यातच नागरिकांची दमछाक होत असताना, ही कारवाई केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. 

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना, हक्काचा निवारा गेल्याने अशा परिस्थितीत आता मुलाबाळांना सोबत घेऊन आश्रय घायचा तरी कुठे, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. 

टॅग्स :thaneठाणेfireआगbhiwandiभिवंडी