शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कुटुंबातील ३० जणांना कोरोना; गणेशोत्सवात एकत्र आल्याने झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 00:23 IST

कल्याण शहरातील घटना

कल्याण : पश्चिमेतील जोशीबागमधील एका इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गणेशोत्सवात हे कुटुंब एकत्र आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता केडीएमसीच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

जोशीबागेतील चार मजली इमारतीत एका व्यावसायिकाचे ४० जणांचे कुटुंब एकत्र राहते. या कुटुंबीयांनी दीड दिवसांचा गणपती बसविला होता. यावेळी उत्सवासाठी सगळे जमले होते. या कुटुंंबात सगळे जण एकत्र स्वयंपाक करतात. तसेच एकत्र जेवतात. गणेशोत्सवात कुटुंबातील एकाला कोरोनाची लक्षणे दिसली. त्याची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ३३ जणांची चाचणी केली असता ३० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी १३ जणांना मेट्रो तर, १७ जणांना ए अ‍ॅण्ड जी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४० वरपोहोचली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उपचाराअंती २६ हजार ११२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत ६६५ जणांचा मृत्यू आहे.

नियम धाब्यावर : अनलॉक-४ मध्ये जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. सरकारी व खाजगी कार्यालयेही अधिक मनुष्यबळाने सुरू झाली आहेत. त्यामुळे वाहने रस्त्यावर येऊ लागल्याने ठिकठिकाणी कोंडी होत आहे. मात्र, अनेक जण मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण