शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

कूचकामी रस्तारूंदीकरण, भार्इंदर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:07 IST

मीरा-भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी गाजावाजा करत रूंद केलेला मुन्शी कम्पाऊंडमधील रस्ता व्यावसायिक व खाजगी वाहनांसह भंगार साहित्य आदींच्या अतिक्रमण विळख्यात सापडला आहे.

मीरा रोड  - मीरा-भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी गाजावाजा करत रूंद केलेला मुन्शी कम्पाऊंडमधील रस्ता व्यावसायिक व खाजगी वाहनांसह भंगार साहित्य आदींच्या अतिक्रमण विळख्यात सापडला आहे. घरे तोडून पालिकेने रूंद केलेला हा रस्ता प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कूचकामी ठरला आहे. दोन्ही बाजूला बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले आहेत.काशिमीरा भागातील मुन्शी कम्पाऊंड झोपडपट्टी ही अरूंद रस्ते व गल्ल्यांसाठी तसेच विविध प्रकारच्या भंगार गोदाम आणि व्यवसायासाठी ओळखली जाते तेवढीच अनधिकृत बांधकामांसाठीही प्रसिद्ध आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतनिधींच्या अर्थपूर्ण संगनमताने अनधिकृत बांधकामांचे इमले फोफावल्याने येथे चांगलीच दाटीवाटी झाली आहे.येथील रस्ता हा जेमतेम २० फुटाचा असल्याने तो ४० फूट रूंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी नागरिकांची राहती घरे व दुकाने तोडली. ज्यांची घरे व दुकाने गेली त्यांना पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने वाटेल तशी वाढीव बेकायदा बांधकामे बांधण्यास मोकळीक देण्यात आली.पालिकेने सुमारे ४० फूट इतका रस्ता रूंद केल्यानंतर येथील रहिवाशांना दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु आजूबाजूला बेकायदा बांधकामांचे इमले वाढण्यासह रस्त्यावरही भंगार - साहित्याचे अतिक्रमण झाले आहे. व्यावसायिक वापराची वाहने मोठ्या संख्येने उभी केली जातात. यामुळे ४० फूट रूंद केलेला रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी मात्र जेमतेम १५ फूटच मिळत आहे. वाहतुकीलाही अडथळा होत आहे. यामुळे रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत.आमची राहती घरे आणि दुकाने रूंदीकरणासाठी तोडली. त्याची दुरुस्ती आणि बांधकामासाठी प्रत्येक रहिवाशाला काही लाखांचा भूर्दंड सहन करावा लागला.हक्काची जागा गेली आणि काही लाखांचे नुकसान सहन करावे लागूनही रस्ता रुंदीकरणाचा फायदाच होत नसल्याचे रहिवाशी सांगतात. प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे तर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेतच पण रस्त्यातील अतिक्रमणांवरही कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.या प्रकरणी अन्वर अली मंसुरी, गुरू घुट्याळ, अतिक सय्यद, अब्दुल हकीम शाह, निखील शिंदे, राजू देशपांडे, इरफान सिद्दीकी आदी रहिवाशांच्या शिष्टमंडळाने रॉयल सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेऊन अतिक्रमणाबाबत तक्रार केली.... तर रूंदीकरण हवे कशाला?आधी असलेला २० फुटाचा रस्ता बरा होता. आता रस्ता ४० फूट करूनही नागरिकांना वापरायला मात्र जेमतेम १५ फूटच मिळत असल्याचे आयुक्तांना सांगितले. आपत्कालिनवेळी अग्निशमन दलाची गाडी, रूग्णवाहिकाही आत येणार नाही अशी गंभीर स्थिती आहे.रूंदीकरणासाठी घरे, दुकाने तोडून त्यांचे लाखोंचे नुकसान पालिकेने केले. पण जर रस्त्यावर अतिक्रमण होऊन कारवाई होत नसेल तर रूंदीकरण हवे तरी कशाला? असा सवाल रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, आयुक्तांनी प्रभाग अधिकारी बोरसेंना त्वरित फोन करुन अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्याचे अनवर अली यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर