शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

वरसावे पुलाचे बांधकाम 24 ऐवजी 18 महिन्यांत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 16:44 IST

वरसावे ४ पदरी व २.२५ किमी अंतराचा सुमारे २४७ कोटी खर्चाचा उड्डाणपूल २४ ऐवजी १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणांना दिले.

भार्इंदर - मुंबई व गुजरातला जोडणारा तिसरा नियोजित वरसावे ४ पदरी व २.२५ किमी अंतराचा सुमारे २४७ कोटी खर्चाचा उड्डाणपूल २४ ऐवजी १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणांना दिले.मीरा रोड येथील एस. के. स्टोन मैदानात गुरुवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत नियोजित वरसावे पुलासह महामार्ग रुंदीकरण, ठिकठिकाणचे अंडरपास व पादचारी पुलाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पुलाच्या बांधकामावेळी होणा-या वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सरकारी यंत्रणांनी सहकार्य करावे, जेणेकरून निश्चित कालावधीपूर्वी पुलाचे बांधकाम शक्य होण्याची अपेक्षा व्यक्त केली.मागील सरकारच्या ७० वर्षांच्या कार्यकाळात अवघे ५ हजार किमीपर्यंतचेच रस्ते तयार करण्यात आले. मात्र यंदाच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात २० हजार किमीपर्यंतचे साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वात जास्त रोजगार बांधकाम क्षेत्रातून उपलब्ध होत असल्याने त्याचा विकास एमएमआर रिजनमध्ये होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात त्यात आणखी वाढ होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा त्यांनी केला.२२ किमी अंतराच्या न्हावाशेवा सागरी सेतूला राज्य सरकारने मान्यता दिली असून, ३१ मार्चपर्यंत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे ते वरळी सी-लिंकचा विस्तार अंधेरी वर्सोवादरम्यान करण्यात येणार असून, त्यापुढे देखील त्याच्या विस्तारासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील सर्व मार्ग एकमेकांना जोडण्याचे काम सुरू असून, त्या दृष्टीने सरकार जल, स्थल, आकाश व पाताळात वाहतुकीचे पर्याय निर्माण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पूर्वी २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळत होते ते २०११ पर्यंतच्या झोपड्यांपर्यंत वाढविण्यात आले असून, त्यांना पंतप्रधान आवास योजनेत सामावून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, खा. विष्णू सावरा, खा. चिंतामण वनगा, खा. गोपाळ शेट्टी, आ. हितेंद्र ठाकूर, आ. संजय केळकर, आ. रवींद्र फाटक, आ. नरेंद्र मेहता, आ. क्षितिज ठाकूर, आ. अमित घोडा, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, महामार्ग प्राधिकरणाचे ए. के. सिंग, पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते आदी मान्यवर उपस्थित होते.२०१८ मध्ये होऊ घातलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मीरा-भार्इंदरमधील नागरीकांनी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पूर्वीच्या सर्वेक्षणात ज्यांचा क्रमांक खाली होता तो कित्येक पटीने वर आल्यास त्यांना विशेष पुरस्कार दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी पालिकेचा देशात १६५ वा क्रमांक होता तो यंदा ३५ व्या क्रमांकापर्यंत स्थिरावला असून तो आणखी वरच्या स्तरावर पोहोचविण्यास नागरिकांनी सहकार्य करून पहिल्या २० क्रमांकामध्ये पालिकेला पोहोचविण्यास नागरिकांनी स्वच्छता मोहिमेतून अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस