शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

खाड्यांच्या प्रदूषणास नियंत्रण मंडळाचा वरदहस्त; मासेमारी नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 03:15 IST

मीठ व्यवसायही आला धोक्यात, मासेमारीसह येथील शिलोत्र्यांच्या पारंपरिक मीठ व्यवसायावरही परिणाम झालेला आहे. सांडपाण्यामुळे तर अनेकांनी मीठ उत्पादन करणेच सोडून दिले आहे

धीरज परबमीरा रोड : मीरा- भाईंदरमधील औद्योगिक आणि निवासी क्षेत्रातील प्रदूषित सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात आहे. याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचाच वरदहस्त आहे. त्यामुळे खाड्या प्रदूषित होऊन पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत असून येथील पारंपरिक मासेमारी नष्ट झाली आहे तर मीठ व्यवसायही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मीरा- भाईंदरचे झपाट्याने औद्योगिकीकरण व नंतर शहरीकरण झाले आहे. काशिमीरा, पेणकरपाडा, मीरा गाव एमआयडीसी, भाईंदर पूर्व व मीरा रोडच्या अनेक भागात लहान - मोठे उद्योग आहेत. यात रसायनांपासून अनेक प्रदूषणकारी उद्योग आहेत. रासायनिक सांडपाण्यासह निवासी क्षेत्रातील सांडपाणीही महापालिकेच्या गटार - नाल्यांद्वारे खाडी पात्रात सोडले जाते. पालिकेच्या बहुतांश मलनिस्सारण प्रकल्पातून सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट विविध खाड्यांमध्ये सोडले जाते. पालिकेने भूमिगत गटार योजना आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक तसेच निवासी भागातील सांडपाणी जाफरी खाडी, घोडबंदर खाडी, वरसावे खाडी, नवघर खाडी, जयआंबे नगर खाडी, नाझरेथ खाडी, वसई खाडी, मुर्धा खाडी, राई खाडी, मोरवा खाडी, उत्तन नवीखाडी तसेच समुद्रात सोडले जाते. परिणामी खाडीच्या पाण्यााला दुर्गंधी येते. मासेमारीसह येथील शिलोत्र्यांच्या पारंपरिक मीठ व्यवसायावरही परिणाम झालेला आहे. सांडपाण्यामुळे तर अनेकांनी मीठ उत्पादन करणेच सोडून दिले आहे. दरम्यान, जल प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ईश्वर ठाकरे व सुवर्णा गायकवाड यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता प्रतिसाद मिळाला नाही.

उद्योगातून सोडले जाणारे रासायनिक प्रदूषित घटक आहेत . तसेच महापालिकेने आमच्या नैसर्गिक खाड्यांमध्ये बेकायदा गटारे बांधून सांडपाणी, मलमूत्र थेट सोडल्याने त्या प्रदूषित झाल्या आहेत. मासळी नष्ट होऊन मासेमारी बंदच झाली आहे. तर मीठ व्यवसायही अखेरच्या घटका मोजत आहे. महापालिकेने चालवलेल्या या जल प्रदूषणास प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार आहे. आपण अनेक तक्रारी केल्या. परंतु कारवाई झालेली नाही. - अशोक पाटील, अध्यक्ष, शिलोत्री संघ

जल प्रदूषण कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने खाड्यात रासायनिक व सांडपाणी सोडणाऱ्या महापालिकेसह संबंधित उद्योगांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहिजे .  दूषित सांडपाणी सोडणे व त्यासाठी कच्चे - पक्के नाले बांधले त्या  कंत्राटदारांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. - स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्ती 

टॅग्स :riverनदी