शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 02:59 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कचरा उचलण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करतात. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे. खाजगीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच महासभेत मंजूर झाला आहे.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. मात्र, महापालिकेचे सफाई कामगार कमी आहेत. त्यामुळे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत. महापालिकेच्या दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून करण्यासाठी निविदा मागवली आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार प्रतिकिलो अथवा मेट्रीक टनामागे किती दर आकारणार, त्याचा तपशील कंत्राटदाराने नमूद करावा, असे महापालिकेने निविदेत म्हटले आहे. कमी दराच्या निविदाधारकास हे काम दिले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वीही कचरा खाजगीकरणाची निविदा काढली होती. मात्र, तिला दोनच कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकोप स्पर्धा झाली नाही. आता पुन्हा नव्याने दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. या निविदेला दोघांचा प्रतिसाद मिळाल्यास आणि दर कमी असलेल्या कंत्राटदारास कंत्राट दिले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महापालिकेकडे २२०० सफाई कामगार आहे. सरकारच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ५०० सफाई कामगार हवेत. परंतु, या निकषात सरकारने फेरबदल करून एक लाख लोकसंख्येसाठी २५० सफाई कामगार हवेत, असा निकष जाहीर केला. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख, तर २७ गावांची लोकसंख्या तीन लाख होती. २७ गावे महापालिकेत आल्याने महापालिकेची लोकसंख्या १५ लाख झाली. जनगणना होऊन सात वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात वाढलेली लोकसंख्या पाहता महापालिका हद्दीत आजमितीस १८ लाख लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेत तीन हजार ७०० सफाई कामगार, तर १८ लाखांच्या लोकसंख्येनुसार सध्या साडेचार हजार सफाई कामगार हवेत. नवी भरतीअभावी हा निकष सरकारी आदेशानुसार केवळ कागदावरच आहे. सफाई कामगार कमी असल्याने कचरा उचलण्याच्या कामावर ताण पडतो.महापालिकेकडे कचरा उचलून नेण्यासाठी ६० वाहने आहेत. आणखी १६ वाहनेखरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या १६ गाड्यांच्या खरेदीवर अडीच कोटी खर्च होणार आहेत. सध्याच्या ६० कचरावाहक गाड्यांपैकी काही गाड्या भंगार झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.कर्मचारी अन्य प्रभागांत वळवणारपाच प्रभाग क्षेत्रांतील खाजगीकरण झाल्यास तेथील कामगार अन्य पाच प्रभाग क्षेत्रांत सफाईसाठी वळवले जातील. अपुºया मनुष्यबळाअभावी सध्या २७ गावांत योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही.महापालिका कचरा उचलण्याच्या कामावर वर्षाला १२ कोटी रुपये खर्च करते. पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे खाजगीकरण झाल्यास त्यावर जवळपास आठ ते दहा कोटी रुपये खर्च होऊ शकतो.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkalyanकल्याण