शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 02:59 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कचरा उचलण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करतात. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे. खाजगीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच महासभेत मंजूर झाला आहे.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. मात्र, महापालिकेचे सफाई कामगार कमी आहेत. त्यामुळे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत. महापालिकेच्या दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून करण्यासाठी निविदा मागवली आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार प्रतिकिलो अथवा मेट्रीक टनामागे किती दर आकारणार, त्याचा तपशील कंत्राटदाराने नमूद करावा, असे महापालिकेने निविदेत म्हटले आहे. कमी दराच्या निविदाधारकास हे काम दिले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वीही कचरा खाजगीकरणाची निविदा काढली होती. मात्र, तिला दोनच कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकोप स्पर्धा झाली नाही. आता पुन्हा नव्याने दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. या निविदेला दोघांचा प्रतिसाद मिळाल्यास आणि दर कमी असलेल्या कंत्राटदारास कंत्राट दिले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महापालिकेकडे २२०० सफाई कामगार आहे. सरकारच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ५०० सफाई कामगार हवेत. परंतु, या निकषात सरकारने फेरबदल करून एक लाख लोकसंख्येसाठी २५० सफाई कामगार हवेत, असा निकष जाहीर केला. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख, तर २७ गावांची लोकसंख्या तीन लाख होती. २७ गावे महापालिकेत आल्याने महापालिकेची लोकसंख्या १५ लाख झाली. जनगणना होऊन सात वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात वाढलेली लोकसंख्या पाहता महापालिका हद्दीत आजमितीस १८ लाख लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेत तीन हजार ७०० सफाई कामगार, तर १८ लाखांच्या लोकसंख्येनुसार सध्या साडेचार हजार सफाई कामगार हवेत. नवी भरतीअभावी हा निकष सरकारी आदेशानुसार केवळ कागदावरच आहे. सफाई कामगार कमी असल्याने कचरा उचलण्याच्या कामावर ताण पडतो.महापालिकेकडे कचरा उचलून नेण्यासाठी ६० वाहने आहेत. आणखी १६ वाहनेखरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या १६ गाड्यांच्या खरेदीवर अडीच कोटी खर्च होणार आहेत. सध्याच्या ६० कचरावाहक गाड्यांपैकी काही गाड्या भंगार झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.कर्मचारी अन्य प्रभागांत वळवणारपाच प्रभाग क्षेत्रांतील खाजगीकरण झाल्यास तेथील कामगार अन्य पाच प्रभाग क्षेत्रांत सफाईसाठी वळवले जातील. अपुºया मनुष्यबळाअभावी सध्या २७ गावांत योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही.महापालिका कचरा उचलण्याच्या कामावर वर्षाला १२ कोटी रुपये खर्च करते. पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे खाजगीकरण झाल्यास त्यावर जवळपास आठ ते दहा कोटी रुपये खर्च होऊ शकतो.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkalyanकल्याण