शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 02:59 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कचरा उचलण्याचे काम महापालिकेचे सफाई कामगार करतात. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे. खाजगीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच महासभेत मंजूर झाला आहे.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. मात्र, महापालिकेचे सफाई कामगार कमी आहेत. त्यामुळे कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत. महापालिकेच्या दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराकडून करण्यासाठी निविदा मागवली आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदार प्रतिकिलो अथवा मेट्रीक टनामागे किती दर आकारणार, त्याचा तपशील कंत्राटदाराने नमूद करावा, असे महापालिकेने निविदेत म्हटले आहे. कमी दराच्या निविदाधारकास हे काम दिले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वीही कचरा खाजगीकरणाची निविदा काढली होती. मात्र, तिला दोनच कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकोप स्पर्धा झाली नाही. आता पुन्हा नव्याने दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. या निविदेला दोघांचा प्रतिसाद मिळाल्यास आणि दर कमी असलेल्या कंत्राटदारास कंत्राट दिले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महापालिकेकडे २२०० सफाई कामगार आहे. सरकारच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येसाठी ५०० सफाई कामगार हवेत. परंतु, या निकषात सरकारने फेरबदल करून एक लाख लोकसंख्येसाठी २५० सफाई कामगार हवेत, असा निकष जाहीर केला. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख, तर २७ गावांची लोकसंख्या तीन लाख होती. २७ गावे महापालिकेत आल्याने महापालिकेची लोकसंख्या १५ लाख झाली. जनगणना होऊन सात वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात वाढलेली लोकसंख्या पाहता महापालिका हद्दीत आजमितीस १८ लाख लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेत तीन हजार ७०० सफाई कामगार, तर १८ लाखांच्या लोकसंख्येनुसार सध्या साडेचार हजार सफाई कामगार हवेत. नवी भरतीअभावी हा निकष सरकारी आदेशानुसार केवळ कागदावरच आहे. सफाई कामगार कमी असल्याने कचरा उचलण्याच्या कामावर ताण पडतो.महापालिकेकडे कचरा उचलून नेण्यासाठी ६० वाहने आहेत. आणखी १६ वाहनेखरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या १६ गाड्यांच्या खरेदीवर अडीच कोटी खर्च होणार आहेत. सध्याच्या ६० कचरावाहक गाड्यांपैकी काही गाड्या भंगार झाल्या आहेत. त्या निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.कर्मचारी अन्य प्रभागांत वळवणारपाच प्रभाग क्षेत्रांतील खाजगीकरण झाल्यास तेथील कामगार अन्य पाच प्रभाग क्षेत्रांत सफाईसाठी वळवले जातील. अपुºया मनुष्यबळाअभावी सध्या २७ गावांत योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही.महापालिका कचरा उचलण्याच्या कामावर वर्षाला १२ कोटी रुपये खर्च करते. पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे खाजगीकरण झाल्यास त्यावर जवळपास आठ ते दहा कोटी रुपये खर्च होऊ शकतो.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkalyanकल्याण