शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

बांधकाम पुरवठादार रडारवर

By admin | Updated: February 22, 2017 06:06 IST

इमारतीच्या बांधकामासाठी रेती अत्यावश्यक असल्याने रेतीसोबत इतर बांधकाम साहित्य पुरविणारे

अंबरनाथ : इमारतीच्या बांधकामासाठी रेती अत्यावश्यक असल्याने रेतीसोबत इतर बांधकाम साहित्य पुरविणारे हे सरकारच्या रडारवर आले आहे. महसूल बुडवून रेती काढणाऱ्यांवर कारवाई न करता रॉयल्टी भरुन रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने रेती माफियांना संरक्षण देत बांधकाम साहित्य पुरविणाऱ्यांवर रेती माफियासारखी वागणूक देण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात बदलापूर आणि अंबरनाथमधील बांधकाम साहित्य पुरविणारे संघटित होत असून या प्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.जिल्ह्यात पर्यावरणाचा विषय पुढे करुन खाडीतून रेती काढण्याचे लिलावच न झाल्याने जिल्ह्यासह राज्यातही रेतीचा तुटवडा निर्माण झाला. मात्र त्यानंतर सरकारने रॉयल्टी सुरु करुन रेती पुरवठा सुरु केला. मात्र असे असले तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप रेतीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. रॉयल्टीच नसल्याने रेती काढण्यावर अनेक ठिकाणी बंदी आहे. जिल्ह्यात रेती काढली जात नसल्याने बांधकाम व्यावसायिक हे परजिल्ह्यातून रेतीची मागणी करत आहे.बांधकाम व्यवसायिकांना रेतीचा पुरवठा करणारे पुरवठादार हे इतर जिल्ह्यातून रॉयल्टी भरुन ठाणे जिल्ह्यात रेती पुरविण्याचे काम करत आहे. ठाणे जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातूनच रेती येत असल्याने जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी या गाड्या अडविण्याचे काम करत आहेत. मुरबाड, शहापूर या भागातून रेतीचे ट्रक येत असल्याने या भागातच तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी गाड्या अडवतात. गाड्या अडविल्यावर रेतीच्या रॉयल्टीची पावती दाखविल्यावरही या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे समाधान होत नाही. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती भरल्याचा ठपका ठेवत या गाड्या थेट तहसीलदार कार्यालयासमोर आणल्या जातात. त्यानंतर आरटीओकडून या गाड्यांमध्ये भरलेल्या रेतीचे मोजमाप केल्यावर त्याचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाते. मात्र आरटीओकडून मोजमाप करण्यास विलंब लागत असल्याने या गाड्या १० ते १२ दिवस तहसीलदार कार्यालयातच उभ्या ठेवतात. जास्तीची रेती आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्या गाड्या सोडल्या जातात. मात्र शहापूरमध्ये दंडात्मक कारवाईनंतरही गाड्या तशाच उभ्या ठेवल्या जातात. तर ज्या गाड्यांमध्ये जास्त रेती आढली नाही त्यांना लागलीच सोडणे अपेक्षित असले तरी हे पथक त्यांना १५ दिवस गाड्या देत नाही अशी तक्रार रेती पुरवठादारांनी केला आहे. शहापूरमध्ये ज्या १७ ते २० गाड्या पकडल्या त्यातील ६ ते ७ गाड्या बदलापूरमधील रेती पुरवठादारांच्या आहेत. त्यांच्याकडे नियमानुसार रॉयल्टीची पावती असूनही त्यांच्या गाड्या सोडलेल्या नाहीत. रेती काढतानाच त्याचा महसूल सरकारला मिळतो. त्यानंतर रेती पुरवठा करताना पुरठादाराला रॉयल्टही भरावी लागते. सहा टक्के व्हॅटही भरावा लागतोे. ज्या गाड्या विकत घेतल्या आहेत त्यांचा ५० ते ६० हजार रुपये हप्ताही बँकेत भरावा लागतो. या व्यतीरिक्त डिझेल, पगार आणि गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च अशा सर्वांसाठी पुरवठादारांना आता आर्थिक चणचण भासत आहे. गाड्या सुरु राहिल्यावरच दोन पैसे मिळतील आणि त्यातून सर्व गोष्टींची पूर्तता होते. मात्र नियमात राहिल्यावरही गाड्या १५ दिवस कारवाईच्या नावाने उभ्या केल्यास गाडीचे हफ्ते आणि पगार देणार कसा असा प्रश्न पुरवठादारांनी केला आहे. (प्रतिनिधी)तक्रार केल्यास त्रासाची शक्यताच्पुरवठादार हे समस्यांना सामोरे जात असले तरी अद्याप या प्रकरणी कुणाकडे तक्रार केलेली नाही. तक्रार केल्यावर आपल्याला जास्त त्रास देतील या भावनेने कुणीच पुढे येत नाहीत. च्मात्र आता या पुरवठादारांच्या बाजूने संघर्ष करण्यासाठी बदलापूरातील काही तरुण पुढे आले आहेत. त्यांनी या पुरवठादारांच्या समस्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची तयारी केली आहे. दरम्यान, या संदर्भात शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.