शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

लोकग्राम पादचारी पूल बांधण्याचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:56 IST

पादचाऱ्यांची परवड सुरू : रेल्वेसोबत केडीएमसीची आज बैठक

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक ते कल्याण पूर्व लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल हा धोकादायक झाल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल नव्याने कोणी बांधायचा यावर एकमत होत नसल्याने तिढा कायम आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची रेल्वे प्रशासनासोबत बुधवारी बैठक होणार आहे.

कल्याण पूर्वेतील लोकग्रामला जाण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल होता. मुंबईतील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनांनंतर रेल्वेने २९ पादचारी पुलांचे लेखा परीक्षण केले होते. त्यानुसार लोकग्राम पादचारी पूल हा धोकादायक झाल्याने तो बंद करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या. मे महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल बंद करण्यात आला. पूल बंद करण्याचे आदेश रेल्वेने महापालिकेस दिले तेव्हा रेल्वेकडे पुलाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ३८ लाख रुपये भरा, असेही फर्मान रेल्वेने सोडले होते. हा पूल १९९१ मध्ये बांधण्यात आला होता. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत नागरिकांच्या रहदारीसाठी पर्यायी व्यवस्था महापालिकेने करावी, असे रेल्वेने सांगितले होते. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकग्राम हा पादचारी पूल नव्याने उभारण्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पात प्रस्तावित आहे. त्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे चर्चा केली आहे. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करूनही रेल्वेकडून त्यासाठी संमती दिली गेलेली नाही. महापालिकेने पुलाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी ७४ लाख ६८ हजार रुपये रेल्वेला यापूर्वी दिले आहेत.

रेल्वेने या पैशातून पुलाची कुठे व काय देखभाल-दुरुस्ती केली याचे प्रमाणपत्र रेल्वेने महापालिकेला दिलेले नाही. पूल रहदारीसाठी बंद ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्याला रेल्वे जबाबदार राहील असे आयुक्तांनी रेल्वेला सुनावले आहे.पादचारी पूल रहदारीसाठी बंद असल्याने पादचाऱ्यांची चार महिन्यांपासून परवड सुरू आहे. पादचाºयांना रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ ला कर्जतच्या दिशेने असलेल्या स्कायवॉकवरून सिद्धार्थनगर येथे जाऊन मग लोकग्रामकडे वळसा घालून जावे लागत आहे किंवा कल्याण पश्चिमेतून रिक्षाने पत्रीपुलाला वळसा घालून वाहतूककोंडीचे अडथळे पार करत लोकग्राम गाठावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेता कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावर उद्या मुंबईतील रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयात बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ती उद्या होणार आहे.काय आहे नेमकी अडचण?लोकग्रामच्या नव्या पादचारी पुलासाठी रेल्वेने महापालिकेकडे ८० कोटींची मागणी केली होती. त्यासाठी ८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेने फलाट क्रमांक एक ते लोकग्राम असा पूल बांधण्याचे प्रस्तावित केले.महापालिकेच्या मते फलाट क्रमांक सात ते लोकग्राम इतकाच पोर्शनचा पादचारी पूल बांधण्यासाठी किमान ३० कोटींचा खर्च अपेक्षित असताना ८० कोटी रेल्वेला का द्यायचे, असा मुद्दा महापालिकेने उपस्थित केला आहे. महापालिकेच्या मते कर्जत दिशेने असलेला स्कायवॉकचा एक उतार फलाट क्रमांक ७ ते सिद्धार्थनगरपर्यंत देण्यासाठी १८ कोटींचा खर्च झाला होता.400मीटर लांबीच्या लोकग्रामच्या नव्या पादचारी पूलासाठी ८० कोटी महापालिकेने का मोजायचे, असाही प्रश्न आहे. त्यामुळे रेल्वेकडून हा पादचारी पूल महापालिकेनेच बांधावा अशी भूमिका घेतली आहे. नेमका याच मुद्यावर उद्याच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेlocalलोकलrailwayरेल्वे