शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:40 IST

प्रशासनाने पालकमंत्र्यांना गंडवले; नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आरोप

ठाणे : महापालिका प्रशासन खाजगीत बोलताना सांगते, की क्लस्टर अमलात येणे शक्य नाही. परंतु, पालकमंत्री सांगतात म्हणून ती रेटत आहोत. यावरून प्रशासन हे पालकमंत्र्यांची फसवणूक करून त्यांना गंडवत असल्याचा आरोप ठाणे महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या योजनेला काँग्रेसचा विरोध नसून तिच्या प्रक्रियेला विरोध असल्याचे सांगून तिच्या भूमिपूजनाला काँग्रेस शहराध्यक्षांशिवाय पक्षाचे नगरसेवक अथवा पदाधिकारी जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टर योजनेच्या कामाचे भुूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवताना तीत आजघडीला कशा त्रुटी आहेत ते सांगण्यासाठी काँग्रेसने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी ही योजना काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केल्याचे सांगितले. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ती राबविणे गरजेचे आहे. परंतु, हे करताना त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे.

ठाणे काँग्रेसने ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, शैलेश शिंदे आणि निशिकांत कोळी या चार जणांची एक कमिटी तयार केली होती. तिने या योजनेत कोणत्या त्रुटी आहेत, याचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ती राबवताना काही महत्त्वाच्या बाबींचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. परंतु, त्या न करता सत्ताधाऱ्यांकडून लग्नीनघाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आम्ही या मुद्यावर जनतेच्या बाजूने आहोत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारसोबत शिवसेना असताना काँगे्रस जशी चुकीच्या गोष्टींना विरोध करत होती, तसेच आताही करीत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे संजय घाडीगांवकर, सचिन शिंदे, राजेश जाधव, के.वृषाली, राहूल पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘जनसामान्यांना घरे मिळाली पाहिजे’

ठाण्याची क्लस्टर योजना काँगे्रसचे बाळ आहे. ही योजना पारदर्शकरित्या राबवावी, एसआरप्रमाणे रखडू नये, असे आमचे मत आहे. जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत योजनेच्या प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध राहणार आहे. या योजनेला आमचा विरोध नाही, असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. या योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना घरे मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री भूमिपूजन करून जातील. परंतु, जनतेचे काय, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसthaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार