शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:40 IST

प्रशासनाने पालकमंत्र्यांना गंडवले; नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आरोप

ठाणे : महापालिका प्रशासन खाजगीत बोलताना सांगते, की क्लस्टर अमलात येणे शक्य नाही. परंतु, पालकमंत्री सांगतात म्हणून ती रेटत आहोत. यावरून प्रशासन हे पालकमंत्र्यांची फसवणूक करून त्यांना गंडवत असल्याचा आरोप ठाणे महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या योजनेला काँग्रेसचा विरोध नसून तिच्या प्रक्रियेला विरोध असल्याचे सांगून तिच्या भूमिपूजनाला काँग्रेस शहराध्यक्षांशिवाय पक्षाचे नगरसेवक अथवा पदाधिकारी जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टर योजनेच्या कामाचे भुूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवताना तीत आजघडीला कशा त्रुटी आहेत ते सांगण्यासाठी काँग्रेसने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी ही योजना काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केल्याचे सांगितले. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ती राबविणे गरजेचे आहे. परंतु, हे करताना त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे.

ठाणे काँग्रेसने ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, शैलेश शिंदे आणि निशिकांत कोळी या चार जणांची एक कमिटी तयार केली होती. तिने या योजनेत कोणत्या त्रुटी आहेत, याचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ती राबवताना काही महत्त्वाच्या बाबींचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. परंतु, त्या न करता सत्ताधाऱ्यांकडून लग्नीनघाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आम्ही या मुद्यावर जनतेच्या बाजूने आहोत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारसोबत शिवसेना असताना काँगे्रस जशी चुकीच्या गोष्टींना विरोध करत होती, तसेच आताही करीत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे संजय घाडीगांवकर, सचिन शिंदे, राजेश जाधव, के.वृषाली, राहूल पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘जनसामान्यांना घरे मिळाली पाहिजे’

ठाण्याची क्लस्टर योजना काँगे्रसचे बाळ आहे. ही योजना पारदर्शकरित्या राबवावी, एसआरप्रमाणे रखडू नये, असे आमचे मत आहे. जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत योजनेच्या प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध राहणार आहे. या योजनेला आमचा विरोध नाही, असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. या योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना घरे मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री भूमिपूजन करून जातील. परंतु, जनतेचे काय, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसthaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार