शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:40 IST

प्रशासनाने पालकमंत्र्यांना गंडवले; नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आरोप

ठाणे : महापालिका प्रशासन खाजगीत बोलताना सांगते, की क्लस्टर अमलात येणे शक्य नाही. परंतु, पालकमंत्री सांगतात म्हणून ती रेटत आहोत. यावरून प्रशासन हे पालकमंत्र्यांची फसवणूक करून त्यांना गंडवत असल्याचा आरोप ठाणे महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या योजनेला काँग्रेसचा विरोध नसून तिच्या प्रक्रियेला विरोध असल्याचे सांगून तिच्या भूमिपूजनाला काँग्रेस शहराध्यक्षांशिवाय पक्षाचे नगरसेवक अथवा पदाधिकारी जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टर योजनेच्या कामाचे भुूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवताना तीत आजघडीला कशा त्रुटी आहेत ते सांगण्यासाठी काँग्रेसने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी ही योजना काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केल्याचे सांगितले. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ती राबविणे गरजेचे आहे. परंतु, हे करताना त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे.

ठाणे काँग्रेसने ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, शैलेश शिंदे आणि निशिकांत कोळी या चार जणांची एक कमिटी तयार केली होती. तिने या योजनेत कोणत्या त्रुटी आहेत, याचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ती राबवताना काही महत्त्वाच्या बाबींचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. परंतु, त्या न करता सत्ताधाऱ्यांकडून लग्नीनघाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आम्ही या मुद्यावर जनतेच्या बाजूने आहोत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारसोबत शिवसेना असताना काँगे्रस जशी चुकीच्या गोष्टींना विरोध करत होती, तसेच आताही करीत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे संजय घाडीगांवकर, सचिन शिंदे, राजेश जाधव, के.वृषाली, राहूल पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘जनसामान्यांना घरे मिळाली पाहिजे’

ठाण्याची क्लस्टर योजना काँगे्रसचे बाळ आहे. ही योजना पारदर्शकरित्या राबवावी, एसआरप्रमाणे रखडू नये, असे आमचे मत आहे. जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत योजनेच्या प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध राहणार आहे. या योजनेला आमचा विरोध नाही, असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. या योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना घरे मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री भूमिपूजन करून जातील. परंतु, जनतेचे काय, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसthaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार