शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:40 IST

प्रशासनाने पालकमंत्र्यांना गंडवले; नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आरोप

ठाणे : महापालिका प्रशासन खाजगीत बोलताना सांगते, की क्लस्टर अमलात येणे शक्य नाही. परंतु, पालकमंत्री सांगतात म्हणून ती रेटत आहोत. यावरून प्रशासन हे पालकमंत्र्यांची फसवणूक करून त्यांना गंडवत असल्याचा आरोप ठाणे महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या योजनेला काँग्रेसचा विरोध नसून तिच्या प्रक्रियेला विरोध असल्याचे सांगून तिच्या भूमिपूजनाला काँग्रेस शहराध्यक्षांशिवाय पक्षाचे नगरसेवक अथवा पदाधिकारी जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टर योजनेच्या कामाचे भुूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवताना तीत आजघडीला कशा त्रुटी आहेत ते सांगण्यासाठी काँग्रेसने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी ही योजना काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केल्याचे सांगितले. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ती राबविणे गरजेचे आहे. परंतु, हे करताना त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे.

ठाणे काँग्रेसने ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, शैलेश शिंदे आणि निशिकांत कोळी या चार जणांची एक कमिटी तयार केली होती. तिने या योजनेत कोणत्या त्रुटी आहेत, याचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ती राबवताना काही महत्त्वाच्या बाबींचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. परंतु, त्या न करता सत्ताधाऱ्यांकडून लग्नीनघाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आम्ही या मुद्यावर जनतेच्या बाजूने आहोत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारसोबत शिवसेना असताना काँगे्रस जशी चुकीच्या गोष्टींना विरोध करत होती, तसेच आताही करीत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे संजय घाडीगांवकर, सचिन शिंदे, राजेश जाधव, के.वृषाली, राहूल पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘जनसामान्यांना घरे मिळाली पाहिजे’

ठाण्याची क्लस्टर योजना काँगे्रसचे बाळ आहे. ही योजना पारदर्शकरित्या राबवावी, एसआरप्रमाणे रखडू नये, असे आमचे मत आहे. जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत योजनेच्या प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध राहणार आहे. या योजनेला आमचा विरोध नाही, असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. या योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना घरे मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री भूमिपूजन करून जातील. परंतु, जनतेचे काय, असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसthaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार