शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी

By नितीन पंडित | Updated: January 24, 2024 16:22 IST

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.

नितीन पंडित, भिवंडी:काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीच्या वतीने भिवंडीतील रांजणवाडी नाका येथे कोकण आढावा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. 

या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,विरोधीपक्ष नेते विजय वड्डटीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आरिफ नसीम खान,चंद्रकांत हांडोर,भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळावा प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत भिवंडी लोकसभा काँग्रेस लढविणार का ? या प्रश्नावर उत्तर देणे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह,प्रदेश प्रभारी व इतर माजी मंत्र्यांनीही उत्तर देणे टाळले.

इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्या नंतर या विषयावर बोलू असे उत्तर यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रश्नावर अक्षरशः चुप्पी साधली.वरिष्ठांनी या विषयी चुप्पी सधल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून कोकण विभागीय मेळाव्यानंतरही काँग्रेसकडे लोकसभा उमेदवारी येणार की,राष्ट्रवादी या लोकसभेवर आपला दावा मजबूत करणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.तर कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका मनात आणू नये पक्ष संघटना बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आव्हान यावेळी काँग्रेस वरिष्ठानकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा