शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

काँग्रेस ५४, राष्ट्रवादी ४७ जागा लढवणार

By admin | Updated: February 4, 2017 03:33 IST

उल्हासनगर पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा पूर्ण न करताच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा पूर्ण न करताच थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शेवटच्या क्षणी जागावाटपाचा घोळ सोडवता न आल्याने दोन्ही पक्षांनी आपापल्या परिने उमेदवारी दाखल करून जास्तीतजास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आघाडीची वाट न पाहताच दोन्ही पक्षांनी आपले सर्व उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. सर्वच पक्षांनी निष्ठावंतांना डावलून प्रस्थापितांना उमेदवारी दिली असून बहुचर्चित ओमी कलानींसह आठ जण राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर, तर टीमचे २८ सदस्यांनी भाजपाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केले.भाजपा व ओमी टीमचा ४२ व ३६ असा फॉर्म्युला ठरला. रिपाइं आठवले गटाला त्यांनी ठेंगा दाखवला असून ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाचा घोळ न सुटल्याने त्यांनी आपापल्या इच्छुक उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन थेट अधिकृत उमेदवारी देऊ केली. ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने काही जागा काँग्रेससाठी, तर काँग्रेसने काही जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या आहेत. मात्र, बहुसंख्य ठिकाणी तोडगा न निघाल्याने काँगे्रस आणि राष्ट्रवादी यांनी परस्परविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने एकूण ४७ उमेदवारांना, तर काँग्रेसने ५४ उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. यासोबत मातंग समाज, स्वाभिमान संघटना आणि लहुजी सेना यांनादेखील काही जागा सोडल्या आहेत. आघाडीबाबतची अंतिम चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यास शेवटच्या क्षणी वेळ न मिळाल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांची वाट न पाहताच परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. वरवर आघाडी बोलले जात असले तरी अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाल्याने नक्की आघाडी झाली की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपला सोबत घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे निळ्या झेंड्याशिवाय आघाडीच्या दोन्ही पक्षांना निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बीएसपीचे २२ उमेदवार रिंगणातया निवडणुकीत प्रभाग क्रमांक १, २, ३, ७, ८, ११, १३, १४ आणि १८ या पॅनलमधून २२ उमेदवार बीएसपीने निवडणूक रिंगणात उतरवले आहेत, अशी माहिती बीएसपीचे महाराष्ट्र प्रभारी प्रशांत इंगळे यांनी दिली. भारिपतर्फे १५ उमेदवार रिंगणातभारिप बहुजन महासंघाने १५ उमेदवार उल्हासनगरमध्ये रिंगणात उतरवले आहेत. आघाडीची चर्चा रंगत असताना भारिप स्वबळावर लढणार आहे. (प्रतिनिधी)मनसेतर्फे २७ उमेदवार मनसेच्या वतीने या निवडणुकीत एकूण २७ उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. मनसे स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याने १२ पॅनलमधून हे २७ उमेदवार उभे केले आहेत. या २७ उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. ठरावीक पॅनलवर लक्ष केंद्रित करून ही उमेदवारी दिल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी स्पष्ट केले. ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडलेल्या जागांवर आपले उमेदवार दिलेले नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी निर्णय झाला नाही, अशा प्रभागांत राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.- प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आघाडीची चर्चा झालेली होती. मात्र, काही जागांवर दोन्ही पक्षांचा दावा होता. त्यामुळे त्या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. काँग्रेसने आपल्या परिने जास्तीतजास्त चांगले उमेदवार दिलेले आहेत. काँग्रेसने इतर समाजालाही काही जागा सोडून त्यांना सोबत जोडण्याचे काम केले आहे. -जयराम लुल्ला, उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष