शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

बाळ्यामामांना काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:37 IST

उमेदवारीवरून दोन गट । निष्ठावंतांना डावलण्यास झाला विरोध

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुरेश टावरे यांना उमेदवारी द्यायची की, शिवसेनेतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांच्या ओंजळीत उमेदवारी टाकायची, यावरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. टावरे हे काँग्रेसमध्ये असून म्हात्रे यांच्याइतके ते दलबदलू नाहीत, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्याची बाब पक्षश्रेष्ठींच्या गळी उतरवण्यात काँग्रेसमधील एक गट यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी सकाळी टावरे यांच्या हातात ‘ए’ व ‘बी’ फॉर्म सोपवले गेले.

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टावरे हे खासदार असताना काँग्रेस पक्षाकरिता त्यांनी पुरेसे सहकार्य केले नसल्याने येथील उमेदवार बदलावा, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची इच्छा होती.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण, मुरबाड या मतदारसंघात काँग्रेस कमकुवत असून शहापूरमध्ये काँग्रेसची स्थिती बेताची आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची बरी स्थिती असून भिवंडी शहरावर काँग्रेसची भिस्त आहे. मात्र, भिवंडी शहरातील काँग्रेसच्याच नगरसेवकांनी टावरे यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने उमेदवार बदलाच्या मागणीला गती प्राप्त झाली.

भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दुखावल्याने तेथे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली, तर भाजपला मतदारसंघ जिंकणे कठीण होईल, अशी चव्हाण यांची अटकळ होती. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून कपिल पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व जितेंद्र आव्हाड हेही सुरेश म्हात्रे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, याकरिता आग्रही होते, असे समजते.काँग्रेसने हिंगोली, चंद्रपूर या मतदारसंघांत अन्य पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी दिली. पुणे मतदारसंघात संजय काकडे, तर जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना आणि त्याचबरोबर भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्याकरिता चव्हाण आग्रही होते. काँग्रेसमधील एका गटाने याला विरोध केला. भाजप आयारामांना उमेदवारी देत असल्याबद्दल आपण त्यांच्यावर टीका करत आहोत. मात्र, आपणही तेच केले तर निष्ठावंत कार्यकर्ते बिथरतील व आपल्यावरही तीच टीका होईल, अशी भूमिका या गटाने घेतली. पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अन्य नेत्यांपर्यंत हीच भूमिका मांडली गेली. म्हात्रे हे आतापर्यंत वेगवेगळे पक्ष फिरून आले आहेत.

काँग्रेसची उमेदवारी घेऊन ते विजयी झाले, तरी ते काँग्रेससोबत एकनिष्ठ राहतील, याची कोणतीही खात्री नाही, असा युक्तिवाद त्यांच्या उमेदवारीबाबत विरोधी गटाकडून केला गेला. म्हात्रे यांचे भिवंडीतील बेकायदा गोदामांशी जोडले गेलेले हितसंबंध व त्यांची या परिसरातील दहशत यासारखे मुद्देही दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या कानांवर घातले गेले. त्यामुळे अखेरीस म्हात्रे यांचा पत्ता कापला जाऊन टावरे यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.दरम्यान, म्हात्रे यांनी राज्यातील नेत्यांकडून उमेदवारी मिळत नसल्याने केंद्रातील एका नेत्याला हाताशी धरून उमेदवारीकरिता खटपट केली. यामुळे राज्यातील ज्या नेत्याने त्यांच्या उमेदवारीकरिता दिल्लीत शब्द टाकला होता, तो नेताही नाराज झाला. पक्षश्रेष्ठींचे मत म्हात्रे यांच्याबाबत अनुकूल नसल्याचे लक्षात येताच दिल्लीतील नेत्याने म्हात्रे यांचे नाव रेटले नाही आणि राज्यातील नेत्यानेही म्हात्रे यांची पाठराखण करणे सोडून दिले, ही बाबदेखील टावरे यांच्या पथ्यावर पडल्याची आणखी एक चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू होती. 

सुरेश टावरे यांची उमेदवारी २२ मार्च रोजी जाहीर झाली होती. परंतु, काँग्रेस पक्षातील काही नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रेष्ठींकडेही पत्रव्यवहार केला होता. यामुळे श्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत होते. त्यानंतर, सर्व्हे करण्यात आला. टावरे यांनाच उमेदवारी दिली तर ते निवडून येतील, असे सर्व्हेत स्पष्ट झाले. त्यामुळे अखेर टावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बाळ्यामामाला उमेदवारी मिळावी, यासाठी कोण लॉबिंग करत होते, यावर सध्या तरी भाष्य करू शकत नाही. काँग्रेसचे जे नगरसेवक नाराज होते, त्यांची समजूत काढली असून त्यांनी टावरे यांच्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे.- सुभाष कानडे, प्रभारी, भिवंडी लोकसभा मतदारसंघ

टॅग्स :congressकाँग्रेसthane-pcठाणे