शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

कारखानदारांमध्ये संभ्रम : मालमत्ताकराची लाखोंची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:26 IST

कारखानदारांमध्ये संभ्रम : केडीएमसीच्या करनिर्धारक व संकलकांना ‘कामा’चा सवाल

कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील कारखानदारांना केडीएमसीने लाखो रुपयांची मालमत्ताकराची बिले पाठवली आहेत. त्यामुळे कारखानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याप्रकरणी कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेने महापालिका मुख्यालयात शुक्रवारी करनिर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांची भेट घेत जादा कराची आकारणी कशी केली, असा प्रश्न विचारला.

डोंबिवलीतील फेज-१ आणि २ मध्ये जवळपास ४५० कारखाने आहेत. ते १९८३ ते २००२ पर्यंत महापालिका हद्दीत होते. २००२ नंतर २७ गावे केडीएमसीतून वगळल्याने प्रत्येक कारखान्याकडून ग्रामपंचायती वर्षाला किमान १३ ते १५ हजार रुपये मालमत्ताकर घेत होत्या. मात्र, जून २०१५ नंतर २७ गावे पुन्हा महापालिकेत आली. महापालिकेने दहापट जास्त म्हणजे एक ते दीड लाखाची बिले प्रत्येक कारखानदारास पाठवली आहेत. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. प्रति एक हजार फुटांमागे मालमत्ताकर आकारला आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना पाच ते दहा लाखांचेही बिल आले आहे. त्यामुळे कर भरण्यापेक्षा कारखाना बंद केलेला बरा, अशी भावना या कारखानदारांची आहे.एखाद्या कारखान्याला १० हजार रुपये मालमत्ताकराचे बिल येत असल्यास त्यात सरकारी नियमानुसार २० टक्के वाढ लागू करून किमान १२ हजार रुपये बिल आले पाहिजे. मात्र, तसे न करता मालमत्ताकरात रस्ते, शिक्षण, पाणीवापर लाभ, उपकर आदी सरसकट करआकारणी केल्याने ही रक्कम वाढली आहे. ४५० कारखानदारांना प्रत्येकी एक ते दीड लाखाचे बिल आल्याचे गृहीत धरल्यास कारखानदारांकडून महापालिकेने एकूण सहा कोटी ७५ लाखांची मागणी केली आहे, असा प्राथमिक अंदाज ‘कामा’चे सेक्रेटरी देवेन सोनी यांनी व्यक्त केला. यासंदर्भात सोनी यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना साकडे घातले. त्यावर चव्हाण यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपाचे नगरसेवक संदीप पुराणिक व सोनी यांनीही कुलकर्णी यांची भेट घेतली.

सोनी म्हणाले की, ‘सरकारच्या नियमानुसार २० टक्के करवाढ कारखानदारांना मान्य आहे. मात्र, त्यात लागू केलेले अन्य कर मान्य नाहीत. रेटेबल व्हॅल्यूच्या आधारे मालमत्ताकराची आकारणी केली जाते. रेटेबल व्हॅल्यू हा रेडीरेकनर दराच्या आधारे ठरवला जातो. रेडीरेकनरचा दर राज्य सरकार जाहीर करते. रेटेबल व्हॅल्यूनुसार मालमत्ताकर आकारणीस ‘कामा’चा विरोध नाही. मात्र, अचानक १३ ते १५ हजारांहून थेट एक ते दीड लाखाची बिले पाठवून महापालिकेने अन्याय केला आहे. जादा रकमेची बिले कारखानदार भरणार नाहीत.अभय योजनेपूर्वीच वाढीव बिले२७ गावांतील कारखानदारांच्या एलबीटीच्या थकबाकीवर व्याज व दंड महापालिकेने लागू केला होता. तो माफ करण्यासाठी राज्य सरकारने कारखानदारांसाठी अभय योजना लागू करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी पुन्हा कारखानदारांना मालमत्ताकराची जादा बिले पाठवली आहेत.शंकांचे निरसन करणार!करनिर्धारक व संकलक विनय कुलकर्णी म्हणाले, ‘कामा’च्या प्रतिनिधींना विषय समजावून सांगितला आहे. जास्तीची बिले का व कशी आली हे महापालिका समजावून सांगण्यास तयार आहे. त्यासाठी ‘कामा’च्या पुढाकाराने कारखानदारांची बैठक घेतल्यास कारखानदारांच्या शंकाचे निरासन करण्यात येईल. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका