शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अपघात मुक्त ठाणे जिल्हा’ संकल्पना साकारण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 01:08 IST

अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केले. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात रेजिलंट इंडिया या संस्थेने यावेळी सादरीकरण केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री कपिल पाटीलठाणे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रु पाली सातपुते, ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, हेमांगिनी पाटील आदी उपस्थित होते. तर आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार आदी यावेळी उपस्थित होते.सामान्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, अपघाती मृत्युदर कमी करणे आदी विषयांवर चर्चा करून यासंबंधी काय नाविन्यपूर्ण उपाय आपण करू शकतो, याबाबतचे मार्गदर्शन करून पाटील म्हणाले की, गेल्या काही काळात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे ठाणे जिल्ह्यात अपघात कमी होत आहेत. मात्र, अपघात मुक्त ठाणे जिल्हा करण्यासाठी अधिक प्रयत्न करून जिल्ह्याचे नावलौकिक वाढवावे. ठराविक महिन्यात तसेच ठरविक वेळतच जास्त अपघात का होतात, याचे विश्लेषण करावे. तसेच नागरिकांमध्ये नियम पाळण्यासंदर्भाची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. ब्लॅक स्पॉट कमी करून ठाणे जिल्हा झिरो टॉलरन्स सेफ रोड महाराष्टÑ करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले की, राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग हे ठाणे जिल्ह्यातून जातात. त्यादृष्टिने हा जिल्हा महत्त्वपूर्ण आहे. रस्ते सुरक्षा विषयक कामांमध्ये जिल्ह्याने गेल्या वर्षी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील काळातही यापेक्षा अधिक चांगले काम केले जावे. रस्ते सुरक्षासंबंधी ज्या उपाययोजना राबविल्या जातात, त्याची योग्य प्रकारे अमंलबजावणी व्हावी. रस्ते अपघात कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी एकत्र येऊन रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी उपाय योजावेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार गायकवाड आणि अयलानी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने सूचना केल्या. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात रेजिलंट इंडिया या संस्थेने यावेळी सादरीकरण केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस