शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पत्रीपुलाच्या गर्डरआधी पाेहाेच रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:57 IST

मनसेकडून ९० फुटी रस्त्याची पाहणी : आमदारांना पाेलिसांनी राेखले

कल्याण :  कल्याणच्या पत्रीपुलाच्या कामात आधीच विलंब झाला आहे. या पुलाला ९० फुटी रस्त्याचा पाेहाेच रस्ता (अप्रोच रोड) आहे. या रस्त्याचे काम सहा वर्षांपासून अर्धवट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केले तर वाहतूककोंडी सुटू शकते. अन्यथा, पत्रीपुलाचे काम पूर्ण करून काहीच उपयोग होणार नाही, याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शनिवारी लक्ष वेधले आहे.

९० फुटी रस्ता पत्रीपुलाला येऊन मिळतो, तेथील रस्त्याचे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे सहा वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याबाबत नागरिक काशिनाथ गुरव यांनी राज्यपालांपर्यंत पाठपुरावा केला आहे. आज दुपारी एकीकडे पत्रीपुलाचा गर्डर सरकवण्याचे काम सुरू असताना आमदार पाटील यांनी अप्रोच रस्त्याची पाहणी करून महापालिका अभियंत्यास जाब विचारला. अभियंत्याला नीट उत्तरे देता न आल्याने पत्रीपुलाच्या दिशेने महापालिका आयुक्तांना आमदारांसह कार्यकर्ते निघाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत त्यांना पाेलिसांनी राेखून धरले. त्यावर आ. पाटील यांनी इथे बोलवा. अन्यथा, आम्हाला तेथे जाऊ द्या, असा आग्रह धरला. त्यानंतर आयुक्तांशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी सोमवारी भेटण्याचे मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुलाच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. त्यांनी पत्रीपुलाप्रमाणे कोपरपूल, मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपूल, दुर्गाडीपूल, पलावापूल आणि आंबिवली येथील रेल्वेपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पुलाचे गर्डर सरकवण्यासाठी आदित्य ठाकरे येत असल्याचे व्यंगचित्र व्हायरल केले होते.

टॅग्स :MNSमनसेMumbaiमुंबईthaneठाणे