शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलाच्या गर्डरआधी पाेहाेच रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:57 IST

मनसेकडून ९० फुटी रस्त्याची पाहणी : आमदारांना पाेलिसांनी राेखले

कल्याण :  कल्याणच्या पत्रीपुलाच्या कामात आधीच विलंब झाला आहे. या पुलाला ९० फुटी रस्त्याचा पाेहाेच रस्ता (अप्रोच रोड) आहे. या रस्त्याचे काम सहा वर्षांपासून अर्धवट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केले तर वाहतूककोंडी सुटू शकते. अन्यथा, पत्रीपुलाचे काम पूर्ण करून काहीच उपयोग होणार नाही, याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शनिवारी लक्ष वेधले आहे.

९० फुटी रस्ता पत्रीपुलाला येऊन मिळतो, तेथील रस्त्याचे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे सहा वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याबाबत नागरिक काशिनाथ गुरव यांनी राज्यपालांपर्यंत पाठपुरावा केला आहे. आज दुपारी एकीकडे पत्रीपुलाचा गर्डर सरकवण्याचे काम सुरू असताना आमदार पाटील यांनी अप्रोच रस्त्याची पाहणी करून महापालिका अभियंत्यास जाब विचारला. अभियंत्याला नीट उत्तरे देता न आल्याने पत्रीपुलाच्या दिशेने महापालिका आयुक्तांना आमदारांसह कार्यकर्ते निघाले असता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत त्यांना पाेलिसांनी राेखून धरले. त्यावर आ. पाटील यांनी इथे बोलवा. अन्यथा, आम्हाला तेथे जाऊ द्या, असा आग्रह धरला. त्यानंतर आयुक्तांशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी सोमवारी भेटण्याचे मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुलाच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. त्यांनी पत्रीपुलाप्रमाणे कोपरपूल, मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपूल, दुर्गाडीपूल, पलावापूल आणि आंबिवली येथील रेल्वेपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पुलाचे गर्डर सरकवण्यासाठी आदित्य ठाकरे येत असल्याचे व्यंगचित्र व्हायरल केले होते.

टॅग्स :MNSमनसेMumbaiमुंबईthaneठाणे