शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रिक्षात स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण

By admin | Updated: November 7, 2015 02:41 IST

शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत.

ठाणे : शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत. या लावलेल्या कार्डने नागरिकांचा सुरक्षित प्रवासाबरोबर रिक्षांमध्ये विसरलेल्या वस्तू परत मिळू लागल्या आहेत. पण, प्रवास करताना नागरिक कार्डवरील माहितीची पूर्ण नोंद करीत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासात कार्डवरील इत्थंभूत माहितीची नोंद जरूर करून घ्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.रिक्षातील प्रवास सुरक्षित होण्यासाठी २०१४ मध्ये ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस आयुक्तालय परिसरातील सर्व रिक्षांमध्ये स्मार्टकार्डची मोहीम हाती घेतली. मोहिमेंतर्गत ३२ हजार १५० रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्यात आले आहेत. या कार्डवरील माहितीच्या आधारे ठाणे शहर आणि डोंबिवली परिसरात रिक्षा प्रवासात हरवलेल्या वस्तू नागरिकांना परत मिळून देण्यात वाहतूक शाखेला यश येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.