शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:30 IST

सोशल मीडियावरही प्रचार केल्याचा आरोप

मीरा रोड : आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भूमिपूजन करून सोशल मीडियावर प्रचार-प्रसार केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. १० मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भार्इंदर पश्चिमेच्या रत्नप्रिया कॉम्पलेक्स येथे भाजपा आमदार नरेंद्र मेहता, सभापती डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल आणि नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी गटाराच्या कामाचे भूमिपूजन केले. आपल्यासमोरच हा कार्यक्रम झाल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.याशिवाय, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी पालिका शाळेच्या डिजिटल क्लासचे उद्घाटन आणि भानुशाली यांनी एका चौकाचे उद्घाटन आ. मेहता व अन्य नगरसेवकांसह केल्याची पोस्ट छायाचित्रांसह फेसबुकवर टाकली होती. पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने आयोगाकडे लेखी तक्रार करावी लागल्याचे गुप्ता म्हणाले. या तक्रारीनंतर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तक्रारदारासह अधिकाऱ्यांची सुनावणी घेतली.कळवा, मुंब्य्रात कोनशिला जैसे थेमुंब्रा : सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या आचारसंहितेचा कळवा, मुंब्य्रात अनेक ठिकाणी भंग होत आहे. ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये देशात सतराव्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वी रविवारी केली. त्याचक्षणी देशात आचारसंहिता सुरू झाली.आदर्श आचारसंहितेनुसार सार्वजनिक ठिकाणी पक्ष, त्यांची चिन्हे, नेत्यांची नावे, त्यांनी केलेल्या कामांचे जाहीर प्रदर्शन करण्यावर बंदी आहे. परंतु कळवा, मुंब्य्रात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे ठळकपणे मतदारांच्या नजरेस पडत आहेत.या भागात अनेक प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्यात आले. त्यांचे लोकार्पण करताना नेत्यांच्या नावांच्या कोनशिला बसवण्यात आल्या होत्या. मात्र, आचारसंहिता सुरू असतानाही अनेक कोनशिलांवर आच्छादन टाकलेले नाही. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.रविवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होण्याआधी आम्ही उद्घाटन व भूमिपूजन केले. फेसबुकवर कर्मचाऱ्यांनी दुसºया दिवशी पोस्ट टाकल्या. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी असून आचारसंहितेचा भंग केलेला नाही. तक्रारीत तथ्य नाही.- ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा