शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ई-चिठ्ठी सोडविणार सर्वसामान्यांचे प्रश्न - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 07:01 IST

मंगळवारी ते ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेच्या ट्विटर पेजचा शुभारंभ करण्यासाठी आले होते.

ठाणे : पूर्वी एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी पत्रव्यवहार केला जात होता. त्यामध्ये बराच कालावधी निघून जात होता. आता मात्र सोशल मीडियामुळे तक्रारींचे निरसण करणे सोपे झाले असून ठाणे महापालिकेच्या टिष्ट्वटर अकाउंटच्या या ई-चिठ्ठीमुळे सर्वांच्याच समस्या तत्काळ सुटू शकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मंगळवारी ते ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेच्या ट्विटर पेजचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे याउपस्थित होत्या. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सभागृह नेते नरेश म्हस्के, राम रेपाळे, भाजपचे गटनेते नारायण पवार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई महापालिकेतही अशा पद्धतीने पेज तयार केले असून महिनाभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी एखाद्या ठिकाणची समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी नगरसेवकापासून ते महापालिकेपर्यंत विविध विभागात नागरिकांना जावे लागत होते. मात्र, आता या पेजमुळे तुम्ही तुमच्या प्रभागातील तक्रारी, समस्या टाकू शकता आणि त्याची सोडवणूक सुद्धा नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगरसेवकांनीही नागरिकांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. नाही तर, आपल्याकडे तक्रार न करता आपल्या प्रभागातील नागरिकाने अशा थेट तक्रार का केली असा कांगावा करण्याची काहीच गरज नाही. उलट तुम्हीही या माध्यमातून टिष्ट्वटर पेज हॅन्डल करा, जेणे करून तुम्हालाही आपल्या प्रभागातील समस्या या तत्काळ सोडविण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. शिवाय पालिकेने या पेजच्या माध्यमातून पालिकेतील इतर विभागदेखील त्याला जोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम आपल्याला राबवायची असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पालिका आणि लोकप्रतिनिधींची - एकनाथ शिंदेया पेजच्या माध्यमातून ठाणेकरांनी तक्रार केल्यास त्या तत्काळ सोडविण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची असणार आहे. आजच्या काळात तक्रारींचे निरासरण करण्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळेच ही संकल्पना सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी बरोबरच पालिका प्रशासनाचीही आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाAditya Thackreyआदित्य ठाकरे