शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ई-चिठ्ठी सोडविणार सर्वसामान्यांचे प्रश्न - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 07:01 IST

मंगळवारी ते ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेच्या ट्विटर पेजचा शुभारंभ करण्यासाठी आले होते.

ठाणे : पूर्वी एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी पत्रव्यवहार केला जात होता. त्यामध्ये बराच कालावधी निघून जात होता. आता मात्र सोशल मीडियामुळे तक्रारींचे निरसण करणे सोपे झाले असून ठाणे महापालिकेच्या टिष्ट्वटर अकाउंटच्या या ई-चिठ्ठीमुळे सर्वांच्याच समस्या तत्काळ सुटू शकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मंगळवारी ते ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेच्या ट्विटर पेजचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे याउपस्थित होत्या. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सभागृह नेते नरेश म्हस्के, राम रेपाळे, भाजपचे गटनेते नारायण पवार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई महापालिकेतही अशा पद्धतीने पेज तयार केले असून महिनाभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी एखाद्या ठिकाणची समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी नगरसेवकापासून ते महापालिकेपर्यंत विविध विभागात नागरिकांना जावे लागत होते. मात्र, आता या पेजमुळे तुम्ही तुमच्या प्रभागातील तक्रारी, समस्या टाकू शकता आणि त्याची सोडवणूक सुद्धा नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगरसेवकांनीही नागरिकांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. नाही तर, आपल्याकडे तक्रार न करता आपल्या प्रभागातील नागरिकाने अशा थेट तक्रार का केली असा कांगावा करण्याची काहीच गरज नाही. उलट तुम्हीही या माध्यमातून टिष्ट्वटर पेज हॅन्डल करा, जेणे करून तुम्हालाही आपल्या प्रभागातील समस्या या तत्काळ सोडविण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. शिवाय पालिकेने या पेजच्या माध्यमातून पालिकेतील इतर विभागदेखील त्याला जोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम आपल्याला राबवायची असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी पालिका आणि लोकप्रतिनिधींची - एकनाथ शिंदेया पेजच्या माध्यमातून ठाणेकरांनी तक्रार केल्यास त्या तत्काळ सोडविण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची असणार आहे. आजच्या काळात तक्रारींचे निरासरण करण्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम आहे, त्यामुळेच ही संकल्पना सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी बरोबरच पालिका प्रशासनाचीही आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाAditya Thackreyआदित्य ठाकरे