शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

‘गोल्डन बेल्ट’बाबत कटिबद्ध- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 23:49 IST

वाढवणवासीयांना मिळाला दिलासा

पालघर : केंद्रातील मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वाढवण बंदराच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी, डायमेकर आदी घटकांचे मोठे नुकसान होणार आहे. इथल्या माशांच्या ‘गोल्डन बेल्ट’ आणि जैवविविधतेच्या नुकसानीबाबत आपण गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने वाढवणवासीयांना दिलासा मिळाला आहे.केंद्राकडून वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन हे प्रकल्प जिल्ह्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिकांचा एकमुखाने विरोध कायम असतानाही हे प्रकल्प लादले जात असल्याने गेले काही दिवस वाढवणमध्ये आंदोलने छेडली जात आहेत. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, विविध मच्छीमार संघटना, आदिवासी संघटनांना शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिथी विश्रामगृहावर आमंत्रित केले होते. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे, खा. राजेंद्र गावित, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस वैभव वझे, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योती मेहेर, रामकृष्ण तांडेल, राजन मेहेर, जयेंद्र दुबळा, जयकुमार भाय आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे वाढवणविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.   वाढवण, बुलेट ट्रेनसह अनेक प्रकल्प जिल्ह्यावर लादले जात असून पोलीस बंदोबस्तात सर्वसामान्यांवर दबाव टाकला जात असल्याची बाब आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. न्याय देण्याची मागणीसूर्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेल्या चंद्रनगर आणि हनुमान नगर यांचे तीन वेळा पुनर्वसन होऊन आजही हे बाधित लोक न्यायापासून वंचित असल्याची बाब मच्छीमार नेत्या पूर्णिमा मेहेर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार गावितांनी याला दुजोरा देत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे