शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

मीरा भाईंदरमधील दुकाने, व्यवसाय आता रोज खुले ठेवण्यास आयुक्तांनी दिली परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 13:58 IST

नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये हॉटस्पॉट वगळता महापालिकेने सम - विषम पद्धत  आता बंद करून सोमवार पासून दुकाने - व्यवसाय नियमित सुरु करण्यास परवानगी दिली आहे . आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी तसे लेखी आदेश शनिवारी जारी केले . आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन सह शहरातील व्यापारी वर्ग आदींनी याची मागणी केली होती. दुकाने नियमित सुरु होणार असली तरी नागरिक व व्यापाऱ्यांनी देखील जबाबदारीने मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे . 

मीरा भाईंदर मध्ये 11 जुलै पासून दुकानांना सम विषम पद्धतीने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली . कोरोनाच्या संसर्गाचामुळे मार्च अखेरीस पासून भाजीपाला , दूध , किराणा, औषधे आदी अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील व्यवसाय , दुकाने , बाजार आदी सर्व तीन महिन्यां पेक्षा जास्त काळ बंद आहे . शहरातील स्टील उद्योग तसेच अनेक लहान मोठे कारखाने बंद होते . 

यामुळे सगळ्यांचेच मोठे आर्थिक नुकसान झालेले असून लहान - सहान नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे. कोरोनाची लागण सुरु होऊन चार महिने उलटले असून आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या रोज शंभरच्या आसपास जात आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे . पालिकेने घरोघरी सर्वेक्षण चालवले आहे . शिवाय झटपट अशी अँटीजेन चाचणी सुरु केली गेली आहे. 

कोरोनाचा संसर्ग पसरू नये व त्याची लागण होऊ नये यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेतानाच शहरातील नागरिकांची आर्थिक घडी पुन्हा बसवण्याची नितांत आवश्यकता आहे . नागरिकांच्या हाताला काम नाही मिळाल्यास अनेकांवर उपासमारीची पाळी येईल आणि यातून भयंकर असे सामाजिक प्रश्न उभे राहतील  अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मांडली . 

आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी सर्व बाबींचा सारासार विचार करून मीरा भाईंदर मधील सर्व व्यवहार पूर्व पदावर आणण्यासाठी सुधारित आदेश काढून सम विषम पद्धत बंद करावी . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिशन बिगिन अगेन धोरणाचे पालन केले जावे . गर्दी व संसर्गाची धास्ती आहे आणि शासनाने देखील निर्बंध कायम ठेवले आहेत अश्या आस्थापना वगळून शहरातील सर्व दुकाने - व्यवसाय नियमितपणे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली होती . या  शहरातील व्यापारी वर्ग आदींनी देखील सम विषम पद्धत बंद करा अशी मागणी चालवली होती . 

आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी आदेश काढून सोमवार 17 ऑगस्ट पासून  सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळात सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे . परंतु कोरोना हॉटस्पॉट मधील  राहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे . या मुळे आता सर्व दुकानदारांना सरसकट दुकाने सुरु ठेवता येणार आहेत . 

शासन, महापालिका कोरोना संसर्ग रोखण्यासह रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत . बहुतांश नागरिक देखील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे , गर्दी न करणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी जबाबदाऱ्या घेत आहेत . पण जे बेजबाबदार लोक निर्देश पळत नाहीत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई देखील करणे आवश्यक आहे असे सरनाईक म्हणाले .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर