शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

व्यावसायिकांचे पाणी महागले

By admin | Updated: February 19, 2016 02:26 IST

एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

कल्याण : एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली. घरगुती दरवाढ झाली नसली तरी जादा पाण्याचा वापर केल्यासही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शनिवारच्या महासभेत सादर केला जाणार आहे.केडीएमसी क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ३०० द.ल. लीटर पाणीपुरवठा केला जातो. बारावे व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांव्यतिरिक्त जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मोहिली आणि नेतिवली येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी झालेला खर्च आणि पाणीपुरवठ्यात झालेली वाढ, त्याचबरोबर विद्युतदेयके, देखभाल दुरुस्ती, लागणारी रसायने, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर दैनंदिन देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. घरगुती ग्राहकांच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. जर, त्यांनी जादा पाणी वापरले तरच त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे यातून पाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जाईल आणि पाण्याची बचत होईल, याकडे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी लक्ष वेधले. काही सदस्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, चर्चेअंती प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. साधारणपणे घरगुती ग्राहकांना ५०० लीटर पाण्यासाठी प्रतिघनमीटर ७ रुपये दर आकारला जातो.