शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

व्यावसायिकांचे पाणी महागले

By admin | Updated: February 19, 2016 02:26 IST

एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

कल्याण : एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली. घरगुती दरवाढ झाली नसली तरी जादा पाण्याचा वापर केल्यासही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शनिवारच्या महासभेत सादर केला जाणार आहे.केडीएमसी क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ३०० द.ल. लीटर पाणीपुरवठा केला जातो. बारावे व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांव्यतिरिक्त जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मोहिली आणि नेतिवली येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी झालेला खर्च आणि पाणीपुरवठ्यात झालेली वाढ, त्याचबरोबर विद्युतदेयके, देखभाल दुरुस्ती, लागणारी रसायने, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर दैनंदिन देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. घरगुती ग्राहकांच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. जर, त्यांनी जादा पाणी वापरले तरच त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे यातून पाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जाईल आणि पाण्याची बचत होईल, याकडे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी लक्ष वेधले. काही सदस्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, चर्चेअंती प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. साधारणपणे घरगुती ग्राहकांना ५०० लीटर पाण्यासाठी प्रतिघनमीटर ७ रुपये दर आकारला जातो.