शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भिवंडीत वादळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीबद्दल संयुक्त पंचनाम्याची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:15 IST

परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

भिवंडी- परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

तालुक्यात भातपीकाचं एकुण क्षेत्र १६ हजार ७४१.६० हेक्टर असून त्यामध्ये सुमारे २० हजार १३ शेतकरी दरवर्षी भातशेती करीत असतात. भातशेतीत गुजराथ ४, कर्जत-३, जया ही हळवी पीकं घेतली जातात. तर निमगरम जातीची गुजराथ ११ व १७ आणि पुनम ही पीके घेतली जात आहेत. या वर्षी अपेक्षीत पाऊस झाल्याने चांगलं पीक आलं होतं. पण परतीच्या वादळी पावसाने शेतातील पिकांच नुकसान झालं.

सततच्या वीस दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसांत तालुक्यातील ७३३७.३३हेक्टर क्षेत्र बाधित झाले असुन सुमारे ८२१९ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी कार्यालयाकडून वर्तविला जात आहे. त्यापैकी ६६०६.७८ हेक्टर शेतीमध्ये भातशेतीचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर ७३०.५५ हेक्टर क्षेत्रांत ३३टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकाची संयुक्त पंचनाम्याची मोहिम काल बुधवारपासुन राबविण्याची सुरूवात झाली असुन त्याकरीता तहसिल कार्यालयांत या बाबत मिटींग झाली असता तहसिलदार शशीकांत गायकवाड व कृषी अधिकारी वाघचौरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामसेवक,तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक तालुक्यात फिरून बाधित शेतकऱ्यांची माहिती घेणार आहेत.

गावनिहाय व शेतकरीनिहाय हे पंचनांमे करून मिळविलेली माहितीचा अहवाल तहसिलमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.दरम्यान सोमवार २३ ऑक्टोबर रोजी जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंबाडी येथे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्ता रोको केला होता.त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.