शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भिवंडीत वादळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीबद्दल संयुक्त पंचनाम्याची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:15 IST

परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

भिवंडी- परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

तालुक्यात भातपीकाचं एकुण क्षेत्र १६ हजार ७४१.६० हेक्टर असून त्यामध्ये सुमारे २० हजार १३ शेतकरी दरवर्षी भातशेती करीत असतात. भातशेतीत गुजराथ ४, कर्जत-३, जया ही हळवी पीकं घेतली जातात. तर निमगरम जातीची गुजराथ ११ व १७ आणि पुनम ही पीके घेतली जात आहेत. या वर्षी अपेक्षीत पाऊस झाल्याने चांगलं पीक आलं होतं. पण परतीच्या वादळी पावसाने शेतातील पिकांच नुकसान झालं.

सततच्या वीस दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसांत तालुक्यातील ७३३७.३३हेक्टर क्षेत्र बाधित झाले असुन सुमारे ८२१९ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी कार्यालयाकडून वर्तविला जात आहे. त्यापैकी ६६०६.७८ हेक्टर शेतीमध्ये भातशेतीचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर ७३०.५५ हेक्टर क्षेत्रांत ३३टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकाची संयुक्त पंचनाम्याची मोहिम काल बुधवारपासुन राबविण्याची सुरूवात झाली असुन त्याकरीता तहसिल कार्यालयांत या बाबत मिटींग झाली असता तहसिलदार शशीकांत गायकवाड व कृषी अधिकारी वाघचौरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामसेवक,तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक तालुक्यात फिरून बाधित शेतकऱ्यांची माहिती घेणार आहेत.

गावनिहाय व शेतकरीनिहाय हे पंचनांमे करून मिळविलेली माहितीचा अहवाल तहसिलमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.दरम्यान सोमवार २३ ऑक्टोबर रोजी जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंबाडी येथे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्ता रोको केला होता.त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.