शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वादळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीबद्दल संयुक्त पंचनाम्याची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:15 IST

परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

भिवंडी- परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.

तालुक्यात भातपीकाचं एकुण क्षेत्र १६ हजार ७४१.६० हेक्टर असून त्यामध्ये सुमारे २० हजार १३ शेतकरी दरवर्षी भातशेती करीत असतात. भातशेतीत गुजराथ ४, कर्जत-३, जया ही हळवी पीकं घेतली जातात. तर निमगरम जातीची गुजराथ ११ व १७ आणि पुनम ही पीके घेतली जात आहेत. या वर्षी अपेक्षीत पाऊस झाल्याने चांगलं पीक आलं होतं. पण परतीच्या वादळी पावसाने शेतातील पिकांच नुकसान झालं.

सततच्या वीस दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसांत तालुक्यातील ७३३७.३३हेक्टर क्षेत्र बाधित झाले असुन सुमारे ८२१९ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी कार्यालयाकडून वर्तविला जात आहे. त्यापैकी ६६०६.७८ हेक्टर शेतीमध्ये भातशेतीचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर ७३०.५५ हेक्टर क्षेत्रांत ३३टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकाची संयुक्त पंचनाम्याची मोहिम काल बुधवारपासुन राबविण्याची सुरूवात झाली असुन त्याकरीता तहसिल कार्यालयांत या बाबत मिटींग झाली असता तहसिलदार शशीकांत गायकवाड व कृषी अधिकारी वाघचौरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामसेवक,तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक तालुक्यात फिरून बाधित शेतकऱ्यांची माहिती घेणार आहेत.

गावनिहाय व शेतकरीनिहाय हे पंचनांमे करून मिळविलेली माहितीचा अहवाल तहसिलमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.दरम्यान सोमवार २३ ऑक्टोबर रोजी जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंबाडी येथे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्ता रोको केला होता.त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.